हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता जाणा !

चेन्नईमध्ये हिंदु मुन्नानी (हिंदू आघाडीवर) या संघटनेचे कार्यकर्ते शक्तीवेल यांना दिवाळीच्या वेळी हिंदूंकडून चालवल्या जाणार्‍या दुकानांमधूनच साहित्य खरेदी करण्याचे हिंदूंना आवाहन करणारी पत्रके वितरित केल्यावरून अटक करण्यात आली.

केंद्र सरकारने अशा फटाक्यांवर बंदी घालावी !

तमिळनाडूमधील ‘रथनास्’ या फटाक्यांची निर्मिती करणार्‍या आस्थापनाच्या संकेतस्थळावर हिंदूंच्या आराध्यदेवता श्री गणेश, श्रीराम, सीतामाता आणि श्री महालक्ष्मीदेवी यांची चित्रे असलेल्या फटाक्यांची विक्री चालू आहे.

हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता जाणा !

उत्तरप्रदेशातील मुसलमानबहुल गाव असलेल्या बैरमनगरचा सरपंच शमशुल याने मुसलमानांना गावातील हिंदूंवर आर्थिक बहिष्कार घालण्यासाठी चिथावणी दिली. याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे.

सर्वत्रच्या हिंदूंनी जागे रहावे !

‘करवा चौथ’ या सणाच्या पार्श्वभूमीवर मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) येथे हिंदु महासभेने मेंदी काढणार्‍या मुसलमानांना ‘हिंदु महिलांच्या हातांवर मेंदी काढल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतील’, अशी चेतावणी दिली आहे.

हिंदूंसाठी धोक्याची घंटा !

बेंगळुरूमध्ये धर्मांध मुसलमानांनी पैगंबरांच्या जन्मोत्सवानिमित्त काढलेल्या मिरवणुकीमध्ये एम्.आय.एम्.चे नेते अकबरूद्दीन ओवैसी यांच्या हिंदूंच्या विरोधातील जुन्या भाषणातील विधानावर आधारित संगीताच्या तालावर तलवार घेऊन नाच केला.

हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता जाणा !

‘मिलाद-उन-नबी’ या मुसलमानांच्या धार्मिक महोत्सवाच्या वेळी राजस्थान, उत्तरप्रदेश, गुजरात, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र येथे ‘सर तन से जुदा’च्या (धडापासून शिर वेगळे करण्याच्या) घोषणा देण्यात आल्या.

बंगालची बांगलादेशच्या दिशेने वाटचाल !

बंगालमधील मोमीनपूर येथे ‘मिलाद-उन-नबी’ उत्सवाच्या वेळी प्रचंड हिंसाचार आणि तोडफोड झाली. या वेळी हिंदूंची अनेक वाहने आणि दुकाने यांची तोडफोड करण्यात आली.

पाकचे असे धाडस होऊ नये, अशी कारवाई कधी होणार ?

जखाऊ (गुजरात) येथील समुद्रात भारतीय सागरी सीमेत घुसून पाकिस्तानच्या नौसैनिकांनी भारतीय मासेमार्‍यांच्या एका नौकेवर नियंत्रण मिळवून त्यावरील ७ मासेमारांचे अपहरण करून त्यांना मारहाण केली आणि नंतर त्यांना सोडून दिले.

असे आणखी किती भारतियांना आपण मरू देणार ?

पाकिस्तानच्या कारागृहात अटकेत असलेल्या ६ भारतीय बंदीवानांचा गेल्या ९ मासांत मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या सर्वांची शिक्षा पूर्ण होऊनही पाकने त्यांना कारागृहात डांबून ठेवले होते.

‘आप’चा हिंदुद्वेष जाणा !

देहलीच्या ‘आप’ सरकारमधील समाजकल्याण मंत्री राजेंद्र पाल गौतम यांच्या उपस्थितीत एका कार्यक्रमात लोकांना बौद्ध धर्माची दीक्षा देण्यात आली. या वेळी ‘हिंदु देवतांची पूजा करणार नाही आणि त्यांना देव मानणार नाही’, अशी शपथ देण्यात आली.