
पुणे – पुणेकरांनी भाजपला मोठ्या प्रमाणात पाठिंबा देत उमेदवार निवडून दिल्याविषयी मी सर्व पुणेकरांचे आभार मानतो. पुणेकरांनी शहराच्या विकासाला, प्रगतीला आणि भावी पिढीच्या उज्ज्वल भविष्याला प्राधान्य दिले. हीच भावना लक्षात घेऊन आम्ही सत्ता केवळ उपभोगण्यासाठी नव्हे, तर पुणेकरांनी व्यक्त केलेल्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी दायित्वाने काम करू, अशी प्रतिक्रिया केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री आणि पुण्याचे निवडणूक प्रमुख खासदार मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकारांशी संवाद साधतांना व्यक्त केली.
केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांनी सांगितले की, मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुण्याशी संबंधित अनेक प्रश्न शासनदरबारी मार्गी लावले. मागील ५ वर्षांत महानगरपालिकेत असतांना भाजपने केलेली विकासकामे जनतेसमोर मांडली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी वर्ष २०४७ पर्यंतचा पुण्याचा विकास कसा करायचा ? याचे दूरदृष्टीपूर्ण नियोजन पुणेकरांसमोर मांडले. हे विचार पुणेकरांना पटल्याने त्यांनी पुन्हा एकदा भाजपवर विश्वास ठेवला.
बोपोडी येथील दर्ग्यावर महापालिकेची कारवाई !
हिंजवडी ‘आयटी पार्क’ मधील ‘थिंकटेक इंडिया’ आस्थापन रातोरात बंद !
पिंपरी-चिंचवडमध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कारवाई !
‘बालभारती’च्या इतिहासात प्रथमच १ वर्षात ४ इयत्तांची पाठ्यपुस्तके नव्याने प्रकाशित !
मोरगाव (पुणे) येथे ‘हरि ॐ तत्सत्’ परिवार, फोंडशिरस (ता. माळशिरस) यांच्याकडून ३३ आदर्श माता-पित्यांचा सत्कार !
गळ्यातील दागिने हिसकावणार्या कामिल आणि अहमद यांना अटक !