ग्रामपंचायत निवडणुकीत देण्यात आले होते कुत्र्यांपासून सुटका मिळवून देण्याचे आश्वासन !

भाग्यनगर (तेलंगाणा) : तेलंगाणामध्ये गेल्या एका आठवड्यात ५०० हून अधिक कुत्र्यांची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या हत्या ग्रामपंचायत निवडणुकीनंतर झाल्या आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार या घटनांमध्ये पंचायत प्रतिनिधींची भूमिका समोर येत आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांच्या वेळी काही उमेदवारांनी भटके कुत्रे आणि माकडे यांच्या समस्येवर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. निवडणूक जिंकल्यानंतर तीच आश्वासने कुत्र्यांना मारून पूर्ण केली जात आहेत, असे म्हटले जात आहे.
🚨 500 dogs killed in Telangana villages in just one week 🐕💔
Amidst the Supreme Court hearing on stray dogs…
Candidates promised to “get rid of dogs” during Gram Panchayat elections – showing how severe the stray dog menace has become.
When elections shift from roads &… https://t.co/6qFNdmcT0B pic.twitter.com/DHXeldDYpS
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 14, 2026
सरपंचांवर गुन्हा नोंद
कामारेड्डी जिल्ह्यातील पालवंचा मंडळातील भवानीपेट, पालवंचा, फरीदपेट, वाडी आणि बंदारामेश्वरपल्ली या ५ गावांमध्ये गेल्या२-३ दिवसांत सुमारे २०० भटक्या कुत्र्यांना मारण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी ५ सरपंचांसह ६ जणांवर गुन्हा नोंदवला आहे. यापूर्वी हनमकोंडा जिल्ह्यातील श्यामपेट आणि अरेपल्ली गावांमध्ये ६ जानेवारी ते ९ जानेवारी या काळात सुमारे ३०० भटक्या कुत्र्यांची हत्या झाल्याचे प्रकरण समोर आले होते. पोलिसांनी या संदर्भात २ महिला सरपंच आणि त्यांचे पती यांच्यासह ९ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला होता.
विषारी इंजेक्शन देऊन कुत्र्यांना मारल्याचा आरोप
सरपंचांवर आरोप आहे की, त्यांनी कुत्र्यांना मारण्यासाठी विषारी इंजेक्शनचा वापर केला. यासाठी एका व्यक्तीला ठेवले होते. मारलेल्या कुत्र्यांचे मृतदेह गावाबाहेर पुरण्यात आले होते. माहिती मिळाल्यावर पशुवैद्यकीय पथकांनी मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदन केले. मृत्यूचे नेमके कारण आणि वापरलेल्या विषाचा प्रकार शोधण्यासाठी नमुने गोळा करून प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.
The SC’s directive to remove all stray dogs from Delhi-NCR is a step back from decades of humane, science-backed policy.
These voiceless souls are not “problems” to be erased.
Shelters, sterilisation, vaccination & community care can keep streets safe – without cruelty.Blanket…
— Rahul Gandhi (@RahulGandhi) August 12, 2025
संपादकीय भूमिका
|

दौंडमध्ये गुळात साखरेची भेसळ केलेला १७ लाखांचा साठा जप्त !
म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्लाईंग यांचे मुंबईत स्वागत !
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वप्रकरणी प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाच्या लक्ष्मणपुरी खंडपिठासमोर पेच !
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये अवैध मद्यविक्री करणार्यांवर २३ गुन्हे नोंद !
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या प्रशासकपदी जिल्हाधिकार्यांची नियुक्ती !
Ramdas Athawale : (म्हणे) ‘हातभट्ट्या अधिकृत केल्यास सरकारला महसूल मिळेल !’