
नागपूर, १४ डिसेंबर (वार्ता.) – अनेक सदस्य गावांतील स्मशानभूमी सोडून इतर विकासकामांना निधी मागत असतात. जेव्हा २५-१५ अंतर्गत विकासकामांना निधी मागण्यात येईल, तेव्हा गावात स्मशानभूमी असल्याचा दाखला जोडायला लागेल. स्मशानभूमी असेल तरच अन्य विकासकामांना मान्यता देण्यात येईल. स्मशानभूमी नसेल, तर प्रथम स्मशानभूमी बांधण्यास प्राधान्य दिले जाईल, असा शासन आदेश लवकरच ग्रामविकास खात्याकडून काढण्यात येईल, अशी ग्वाही ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी विधान परिषदेत दिली. मंत्री गोरे म्हणाले, ‘‘अहिल्यानगर, अमरावती, नागपूर आणि कोल्हापूर येथील स्मशानभूमी संदर्भात जिल्हाधिकार्यांकडून ‘विशेष सर्वेक्षण’ करण्यात येईल. लवकरात लवकर स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू.’’
मंगेशी येथे स्व. लता मंगेशकर आणि स्व. आशा भोसले यांचे स्मारक आणि संग्रहालय उभारणार ! – पर्यटनमंत्री रोहन खंवटे
दौंडमध्ये गुळात साखरेची भेसळ केलेला १७ लाखांचा साठा जप्त !
शेतकर्यास अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी साहाय्यक कृषी अधिकारी अमोल देवकर तात्काळ निलंबित !
राधानगरी परिसरात (जिल्हा कोल्हापूर) महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक अत्याचार : ४ जणांना अटक !
पुणे जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई !
अहिल्यानगरमध्ये धर्मांधांकडून हिंदु कुटुंबावर प्राणघातक आक्रमण !