Telangana Congress Muslims Appeasement : तेलंगाणातील काँग्रेस सरकारने कब्रस्तानासाठी मुसलमानांना दिली सैन्याची भूमी !

सैन्याने काम थांबवून भूमी कह्यात घेतली !

जागेवरील अतिक्रमण हटवण्यासंदर्भात चर्चा करतांना भारतीय संरक्षण दलाचे अधिकारी

भाग्यनगर (तेलंगाणा) – येथील जुबली हिल्स मतदारसंघात असणार्‍या रहमतनगरमध्ये २२ सहस्र ५०० चौरस फूट भूमी तेलंगाणा वक्फ बोर्डाने वक्फची भूमी घोषित करून तेथे कब्रस्तान बांधण्याची प्रक्रिया चालू केली; मात्र ही भूमी भारतीय संरक्षण दलाची असल्याने सैन्याने हे काम थांब‍वले आणि भूमी कह्यात घेतली. या मतदारसंघात लवकरच पोटनिवडणूक होणार आहे आणि त्यामुळेच राज्यातील काँग्रेस सरकारने वक्फ बोर्डाला कब्रस्तानासाठी अनुमती दिली होती.

सैन्याने सांगितले की,

ही भूमी संरक्षण विभागाची मालमत्ता आहे आणि वक्फ बोर्डाशी याचा काही संबंध नाही. या भागात कोणत्याही अतिक्रमणाला रोखण्यासाठी सैन्याने कारवाई चालू केली आहे.

काँग्रेस मतपेढीच्या राजकारणासाठी कुठल्याही स्तराला जाऊ शकते !

भाजपचे म्हणणे आहे की, जुबली हिल्स पोटनिवडणुकीपूर्वी स्वतःच्या मतपेढीला खुश करण्यासाठी काँग्रेस सरकारने मुसलमानांसाठी सैन्याची ही भूमी उपलब्ध करून दिली. भूमीचे वक्फ बोर्डाला हस्तांतरण, संसदेत वक्फ कायद्याचा विरोध आणि आता सैन्याची भूमी बळकावणे, या सर्व गोष्टी काँग्रेस मतपेढीच्या राजकारणासाठी कुठल्याही स्तराला जाऊ शकते, हे दाखवतात.

संपादकीय भूमिका

‘काँग्रेस सरकार म्हणजे पाकिस्तानी राजवट’, हे प्रत्येक वेळी दिसून येते, तेच ही घटना सांगते !