Rampur Rape case : साजिद पाशा याच्‍याकडून अल्‍पवयीन मुलीचे अपहरण आणि बलात्‍कार

  • रामपूर (उत्तरप्रदेश) येथील घटना

  • साजिद होता रुग्‍णालयाचा संचालक

  • रुग्‍णालयाला टाळे ठोकले !

  • पसार असलेल्‍या साजिदवर २५ सहस्र रुपयांचे बक्षीस !

साजिद पाशा

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – राज्‍यातील रामपूर जिल्‍ह्यात एका अल्‍पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्‍यावर बलात्‍कार केल्‍याची घटना समोर आली आहे. स्‍थानिक प्रसारमाध्‍यमांनी दिलेल्‍या वृत्तानुसार जिल्‍ह्यातील एका नामांकित रुग्‍णालयाचा संचालक साजिद पाशा याने बलात्‍कार केल्‍याचे समजते. ३१ ऑगस्‍टला पीडितेला शिकवणीवर्गाला नेण्‍याच्‍या बहाण्‍याने साजिदने तिचे अपहरण केले. ५ दिवस तिच्‍यावर अत्‍याचार केला. या प्रकरणी पोलिसांनी साजिदचा मित्र मुदस्‍सीर याला अटक केली आहे, तर पसार असलेल्‍या साजिदवर २५ सहस्र रुपयांचे बक्षीस घोषित करण्‍यात आले आहे. त्‍याचे रुग्‍णालय सीलबंद करण्‍यात आले आहे.

स्‍थानिक प्रसारमाध्‍यमांनी दिलेल्‍या माहितीनुसार, रामपूर जिल्‍ह्यात असलेल्‍या स्‍वार भागात रहाणारा साजिद पाशा ‘ग्रीन सिटी’ नावाचे रुग्‍णालय चालवतो. साजिदने ३१ ऑगस्‍टला ‘तुला शिकवणीवर्गात सोडतो, काही अंतरावर तुझ्‍या मैत्रिणी आहेत’, असे भासवून इयत्ता ११वीत शिकणार्‍या अल्‍पवयीन पीडितेला स्‍वतःच्‍या गाडीत बसवले आणि तिचे अपहरण केले. त्‍यानंतर त्‍याने तिला उत्तराखंड राज्‍यात असलेल्‍या रामनगर येथील एका हॉटेलात नेले आणि तिच्‍यावर तीन दिवस बलात्‍कार केला. यानंतर हल्‍दवानी आणि रुद्रपूर येथे नेऊन पुन्‍हा बलात्‍कार केला. या वेळी तिला बंदुकीचा धाक दाखवण्‍यात आला होता. ५ दिवसांनी तिला रामपूरला आणण्‍यात आले. पोलिसांचा वाढता दबाव पाहून साजिदने पीडितेला त्‍याचा मित्र मुदस्‍सीरकडे सोपवून तो पसार झाला. पोलिसांनी पीडितेला मुदस्‍सीरकडून कह्यात घेतले आणि मुदस्‍सीरला अटक केली.

पीडितेच्‍या वडिलांनी साजिदचे वर्णन ‘खान माफिया’, असे केले आहे. तो भूमीशी संबंधित व्‍यवसायही करतो. त्‍याला दोन पत्नी असून एका पत्नीने मागील विधानसभा निवडणूकही लढल्‍याची माहिती समोर आली आहे. पीडितेच्‍या वडिलांनी मुख्‍यमंत्री योगी आदित्‍यनाथ यांच्‍याकडे फरार असलेल्‍या साजिदच्‍या विरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे.

संपादकीय भूमिका

अशा वासनांध मुसलमानाला शरियतनुसार भूमीत खड्डा खणून त्‍यात त्‍याला कंबरेपर्यंत गाडून दगडांनी ठेचून ठार मारण्‍याची शिक्षा द्यावी, अशी मागणी कुणी धर्मप्रेमी मुसलमान कधीच का करत नाही ?