ठाणे येथे १ लाखाहून अधिक मतदारांची नावे मतदारसूचीत नसल्याचा आरोप !

कल्याण येथे मतदारांकडून निवडणूक आयोगाचा निषेध !

ठाणे – कल्याण, भिवंडी या ठाणे जिल्ह्यातील मतदारसंघांमध्ये १ लाखाहून अधिक मतदारांची नावे मतदारसूचीत मिळाली नाही, असा आरोप विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी केला आहे. कल्याण पश्चिम येथील मुंबई विद्यापिठाच्या उपकेंद्रात तर मतदानसूचीत नावे नसल्यामुळे संतप्त नागरिकांनी निवडणूक आयोगाच्या निषेधाच्या घोषणा दिल्याचा प्रकार घडला.

कल्याण येथे ८० सहस्रांहून अधिक नावे मतदारसूचीत नसल्याचे आढळून आले.  मतदारांकडे मतदानपत्र होते; मात्र मतदारसूचीत नाव नव्हते, असा सावळा गोंधळ होता. ‘मतदान करण्याचे आवाहन करता; परंतु मतदारसूचीतून नाव वगळता’, अशा शब्दांमध्ये मतदारांनी निवडणूक आयोगाविषयी संताप व्यक्त केला.