
हुणसुरू – येथे लोकांच्या जिहादी मानसिकतेत झपाट्याने वाढ होत आहे. येथील जिहाद्यांकडून हिंदु युवकांची हत्या केली जात आहे, तसेच त्यांना आत्महत्या करण्यास भाग पाडले जात आहे. याविषयी सरकार आणि पोलीस विभाग यांनी सावध व्हावे, अशी चेतावणी श्रीराम सेनेचे संस्थापक प्रमोद मुतालिक यांनी दिली आहे.
हुणसुरू तालुक्यातील दासनपूर येथील रवि यांचा मुलगा मुत्तुराज याची जिहाद्यांनी नुकतीच हत्या केली होती. मुतालिक यांनी मृत मुत्तुराज याच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. ‘या प्रकरणात दोषींना शिक्षा झालीच पाहिजे. त्यासाठी हिंदु संघटनांकडून कायदेशीर लढ्यासाठी सहाय्य करण्यात येईल’, असे मुतालिक यांनी सांगितले. त्यानंतर त्यांनी गावातील काही प्रमुखांना भेटून त्यांच्याशी चर्चा केली. काही दिवसांपूर्वी के.आर्. नगर येथील पुनीत या हिंदूची मुत्तुराज याच्याप्रमाणेच हत्या करण्यात आली होती. दोन्ही प्रकरणांमध्ये आक्रमण करणारे जिहादी होते.
संपादकीय भूमिकाकर्नाटकचे झपाट्याने इस्लामीकरण होत असल्याने असले प्रकार घडत आहेत. काँग्रेसच्या राज्यात याहून वेगळे काय होणार ? |
म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्लाईंग यांचे मुंबईत स्वागत !
Ramdas Athawale : (म्हणे) ‘हातभट्ट्या अधिकृत केल्यास सरकारला महसूल मिळेल !’
मुंबईत उबेरच्या चालकाकडून तरुणीशी गैरवर्तन
गोरेगाव येथे सरकारी भूमीवरील अवैध दर्गा भुईसपाट !
शासकीय कार्यालयांत ‘केवळ नामधारी’ ही मराठी भाषा अधिकार्यांची ओळख पुसण्यासाठी होणार प्रयत्न !
Khan Sir Coaching Firing : पाटलीपुत्र (बिहार) येथे प्रसिद्ध खान सर यांच्या शिकवणी वर्गावर आक्रमण