गादीचे वारसदार खरे कि खोटे ही जनता ठरवेल ! – राजवर्धनसिंह कदमबांडे

राजवर्धनसिंह कदमबांडे

कोल्हापूर – मी राजर्षी शाहू महाराज यांचा रक्ताचा वारसदार आहे. राजर्षी शाहू महाराज यांचा पणतू आणि प्रिन्स पद्माराजे यांचा चिरंजीव आहे. गादीचे वारसदार खरे कि खोटे हे जनता ठरवेल. मी राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांचा वारसदार आहे, आताचे शाहू महाराज हे संपत्तीचे वारसदार आहेत. आताचे शाहू महाराज हे शहाजी महाराज यांचे वारसदार असू शकतात, राजर्षी शाहू महाराज यांचे वारसदार नाहीत. वारसदार कोण ? हा आमचा घरगुती वाद आहे त्याविषयी बोलणार नाही, दत्तक घेतांना काय वाद झाला होता याबद्दल आपण सगळे जाणून आहोत, अशी प्रतिक्रिया धुळ्याहून कोल्हापुर येथे आलेल्या राजवर्धनसिंह कदमबांडे यांनी प्रसिद्धीमाध्यमांना दिली.

राजवर्धनसिंह कदमबांडे म्हणाले, ‘‘सध्या मी धुळे येथे राजकीय आणि सामाजिक काम करतो. धुळ्यात अधिक कार्यरत राहिल्याने कोल्हापूरकडे दुर्लक्ष झाले. मी आता केवळ महायुतीच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन करण्यासाठी आलो आहे.’’