जितेंद्र आव्हाड यांना बिश्नोई टोळीच्या नावाने खंडणीसाठी धमकी

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड

ठाणे – लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या नावाने भ्रमणभाषवरून २ कोटीच्या खंडणीसाठी आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांना धमकी दिल्याच्या प्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. धमकी देणार्‍याने खंडणीची रक्कम न दिल्यास ‘अभिनेता सलमान खान याचे झाले’, ते तुमचेही करू’ असे म्हटल्याचे तक्रारीमध्ये   म्हटले आहे. या गुन्ह्याचे अन्वेषण ठाणे सायबर सेलकडे सोपवण्यात आले आहे. याविषयी राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी हेमंत वाणी यांनी तक्रार केली आहे.