
नवी देहली – येथील राऊज एव्हेन्यू न्यायालयाने देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या ईडी कोठडीत वाढ झाली आहे. १ एप्रिलपर्यंत त्यांना कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. त्यापूर्वी झालेल्या सुनावणीच्या वेळी केजरीवाल यांनी स्वतः स्वतःची बाजू मांडली. असे करणारे ते देशातील पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत. ईडीने न्यायालयाकडे ७ दिवसांच्या कोठडी मागणी केली होती.
युक्तीवाद करतांना केजरीवाल म्हणाले, ‘‘या प्रकरणात माझे नाव केवळ ४ ठिकाणी आले आहे. ४ जबाब देण्यात असून त्यांपैकी मला गोवण्यात आलेले विधान न्यायालयासमोर मांडण्यात आले. मुख्यमंत्र्यांना अटक करण्यासाठी ही ४ विधाने पुरेशी आहेत का ? हे राजकीय षड्यंत्र आहे, याचे उत्तर जनता देईल.’’ यावर ईडीने उत्तर देतांना म्हटले, ‘‘मुख्यमंत्री कायद्याच्या वर नाहीत.’’
लहान मुलांना सनातन धर्माची सोप्या भाषेत ओळख करून देणारे इंग्रजी भाषेतील पुस्तक प्रकाशित !
‘शिक्षक पात्रता परीक्षे’ची (‘टीईटी’ची) प्रश्नपत्रिका फुटल्याने परीक्षा रहित !
Sir Tan Se Juda : कल्याण येथे पोलीस ठाण्यात धर्मांध महिलांकडून चिथावणीखोर घोषणा !
२ राज्यांतून गोहत्या, लव्ह जिहाद संबंधी ५ घटना उघड !
दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे ! – श्री विश्वप्रसन्न तीर्थ स्वामीजी, पेजावर मठ
श्रीरामलल्लाची मूर्ती साकारणारे शिल्पकार अरुण योगीराज यांची प्रतिक्रिया !