
जळगाव – सर्व पक्षांना त्यांच्या परिवाराला पक्षात पुढे आणायचे आहे. केवळ भाजपला आणण्यासाठी नाही, तर वर्ष २०४७ मध्ये भारताचे भविष्य घडवण्यासाठी, भारताला सुरक्षित करण्यासाठी मतदान करा. मोदी यांनी भारताच्या सीमा सुरक्षित केल्या आहेत. पंतप्रधान मोदी यांना ३ र्यांदा निवडून दिलेत, तर देश ३ र्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेवर जाईल, असे प्रतिपादन गृहमंत्री अमित शहा यांनी केले. ते जळगाव येथील युवा संमेलनात बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, मोदी यांचा १० वर्षांचा कामाचा इतिहासही आहे आणि देशासाठी पुढील २५ वर्षांची दूरदृष्टीही त्यांना आहे. त्यांनी प्रत्येक दिवशी ७५ सहस्र लोकांना दारिद्र्यरेषेबाहेर आणले आहे. नोकरीसाठी जसा ‘बायोडेटा’ पाहिला जातो, तसाच ‘बायोडेटा’ पंतप्रधान होणार्या उमेदवाराचा पाहिला पाहिजे. मोदी यांनी ‘वन रँक वन पेन्शन’ दिले. विधीमंडळात ३३ टक्के आरक्षण महिलांसाठी दिले.
अमित शहा यांनी छत्रपती संभाजीनगर येथेही सभा घेतली. येथे त्यांनी ‘एम्.आय.एम्.’ला उखडून फेकण्याचे आवाहन केले.
Supreme Court Bengal SIR : मतदार सूचीमध्ये नाव नसल्याने नागरिकत्व संपुष्टात येत नाही !
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’