श्रीराममंदिरानंतर सर्वत्र रामराज्याची स्थापना करणे, हेच आपले ध्येय असेल !

श्रीराममंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने सप्तर्षी आणि संत यांचे संदेश

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

गेली ५०० वर्षे रामभक्तांना त्यांच्या प्रभूपासून विलग करणार्‍या इस्लामी आक्रमकांचा अंतत: पराजय झाला. भक्ती, ज्ञान आणि कर्म अशा तीनही स्तरांवर म्हणजेच सर्वार्थाने हिंदू विजयी झाले. या प्रदीर्घ संघर्षमय काळातून तावून सुलाखून निघालेल्या हिंदु जनसमुदायाने श्रीराममंदिराच्या प्रतिष्ठेच्या या दिव्य क्षणी हिंदु धर्माच्या रक्षणासाठी सातत्याने कार्य करण्याचे वचन आपल्या आराध्य श्रीरामाला दिले पाहिजे. श्रीराममंदिरानंतर आता सर्वत्र रामराज्याची स्थापना करणे, हेच आपले ध्येय असेल !’

– श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या एक उत्तराधिकारी)