Raj Thackeray : राज ठाकरे यांना श्रीराममंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण मिळाले नाही, तरी त्यांनी यावे !  

हनुमान गढीचे महंत राजू दास यांचे आवाहन !

(महंत म्हणजे मठ किंवा मंदिर यांचे प्रमुख)

महंत राजू दास व राज ठाकरे

अयोध्या (उत्तरप्रदेश) – राज ठाकरे हे हिंदु वाघ आहेत. त्यांना अयोध्येच्या श्रीराममंदिर उद्घाटनाचे निमंत्रण नक्कीच मिळेल. जर त्यांना निमंत्रण मिळाले नाही, तरीही मी त्यांना आवाहन करतो की, त्यांनी अयोध्येत नक्की यावे. ते सनातनी वाघ आहेत, असे विधान अयोध्येतील हनुमान गढीचे महंत राजू दास यांनी केले आहे. ते एका मराठी वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीशी बोलत होते.

यापूर्वी महंत राजू दास यांनी म्हटले होते की, मुंबईकरांनी अयोध्येत येऊन श्रीराममंदिर उभारण्यात मोठा वाटा उचलला. बाळासाहेब ठाकरे यांनी म्हटले होते, ‘बाबरीचा ढाचा माझ्या लोकांनी पाडला. त्याचा मला अभिमान आहे.’ असा नेता पुन्हा होणार नाही.