प्रेयसीसमवेत भांडण झाल्‍याने पोलीस शिपायाने केली आत्‍महत्‍या !

प्रतिकात्मक छायाचित्र

वरळी (मुंबई) – प्रेयसीसमवेत भांडण झाल्‍यानंतर पोलीस शिपायाने आत्‍महत्‍या केली. भ्रमणभाषवर संदेश आणि छायाचित्र पाठवून त्‍याने आत्‍महत्‍येचे कारणही तिला सांगितले. इंद्रजित साळुंखे (वय २७ वर्षे) असे पोलीस शिपायाचे नाव आहे. १९ नोव्‍हेंबरच्‍या रात्री वरळीच्‍या जलतरण तलावाजवळील लोखंडी ग्रीलला गळफास घेऊन त्‍याने आत्‍महत्‍या केली. या प्रकरणी पोलीस अधिक अन्‍वेषण करत आहेत.

संपादकीय भूमिका

पोलिसांमधील संयम संपत चालल्‍याचे दर्शवणारी घटना ! यावर सरकारने तात्‍काळ उपाययोजना काढणे आवश्‍यक !