साधनेमुळे अनिष्ट शक्तींचा फारसा त्रास न होणे

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

साधना केल्यामुळे ईश्वरी शक्तीची प्राप्ती होऊन अनिष्ट शक्तींचे त्रास अल्प प्रमाणात होतात. समष्टी साधना केल्यामुळे जिवाची उन्नती लवकर होऊन त्याचे मन स्थिर होते. त्यामुळे शरिरावर अनिष्ट शक्तींचे आक्रमण होऊनही त्यांना त्याचा फार काही त्रास जाणवत नाही.

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले      

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.