|
चेन्नई (तमिळनाडू) – तमिळनाडूचे नागपट्टिनम् आणि श्रीलंकेचे कांकेसंथुराई यांमध्ये फेरी (नौका) सेवा चालू करण्यात आली आहे. या सेवेच्या अंतर्गत प्रतीव्यक्ती ७ सहस्र ६७० रुपये भाडे असणार आहे. वर्ष १९८२ मध्ये उत्तर श्रीलंकेत चालू झालेल्या यादवी युद्धामुळे दोन्ही देशांतील समुद्री वाहतूक ठप्प झाली होती. ती आता या फेरी सेवेच्या माध्यमातून पुन्हा चालू करण्यात आली आहे.
Ferry services between India and Sri Lanka will enhance connectivity, promote trade and reinforce the longstanding bonds between our nations. https://t.co/VH6O0Bc4sa
— Narendra Modi (@narendramodi) October 14, 2023
याच्या उद्घाटन समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित होते. या वेळी पंतप्रधान म्हणाले की, ही फेरी सेवा भारत-श्रीलंका संबंधांना अधिक सशक्त करण्यासाठीचे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात संस्कृती, वाणिज्य आणि सभ्यता यांचा एक प्रकारचा समान इतिहास आहे. आम्ही भारत आणि श्रीलंका यांच्यात राजनैतिक अन् आर्थिक संबंध यांच्या एका नव्या अध्यायाला आरंभ करत आहोत. ही नौका सेवा सर्व ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंधांना जिवंत बनवेल.
या वेळी श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे म्हणाले की, उभय देशांतील वाहतूक उत्तर श्रीलंकेत झालेल्या यादवी युद्धामुळे बाधित झाली होती; परंतु आता या फेरी सेवेमुळे त्याला पुन्हा चालना मिळणार आहे.

पाकव्याप्त काश्मीरची भारतात ‘घरवापसी’ करतांना भारताची भूमिका काय असावी ?
पाकव्याप्त काश्मीर आणि बलुचिस्तान येथील जनआंदोलनांचे भारताच्या दृष्टीकोनातून सामरिक विश्लेषण
दक्षिण आफ्रिकेत १७ सहस्र हिंदूंनी एकत्र येऊन केले हनुमान चालिसाचे पठण !
इराणच्या आक्रमणात जॉर्डनमधील २ अमेरिकी सैनिक ठार : अमेरिकेचे प्रत्युत्तर !
मी मुसलमान आहे; पण देशात शरीयत लागू करणार नाही ! : Burkina Faso President Ibrahim
पाकव्याप्त काश्मीरमधील आंदोलकांवरील दडपशाहीविषयी संयुक्त राष्ट्रांकडून चिंता व्यक्त !