|
चेन्नई (तमिळनाडू) – तमिळनाडूचे नागपट्टिनम् आणि श्रीलंकेचे कांकेसंथुराई यांमध्ये फेरी (नौका) सेवा चालू करण्यात आली आहे. या सेवेच्या अंतर्गत प्रतीव्यक्ती ७ सहस्र ६७० रुपये भाडे असणार आहे. वर्ष १९८२ मध्ये उत्तर श्रीलंकेत चालू झालेल्या यादवी युद्धामुळे दोन्ही देशांतील समुद्री वाहतूक ठप्प झाली होती. ती आता या फेरी सेवेच्या माध्यमातून पुन्हा चालू करण्यात आली आहे.
Ferry services between India and Sri Lanka will enhance connectivity, promote trade and reinforce the longstanding bonds between our nations. https://t.co/VH6O0Bc4sa
— Narendra Modi (@narendramodi) October 14, 2023
याच्या उद्घाटन समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित होते. या वेळी पंतप्रधान म्हणाले की, ही फेरी सेवा भारत-श्रीलंका संबंधांना अधिक सशक्त करण्यासाठीचे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात संस्कृती, वाणिज्य आणि सभ्यता यांचा एक प्रकारचा समान इतिहास आहे. आम्ही भारत आणि श्रीलंका यांच्यात राजनैतिक अन् आर्थिक संबंध यांच्या एका नव्या अध्यायाला आरंभ करत आहोत. ही नौका सेवा सर्व ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंधांना जिवंत बनवेल.
या वेळी श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे म्हणाले की, उभय देशांतील वाहतूक उत्तर श्रीलंकेत झालेल्या यादवी युद्धामुळे बाधित झाली होती; परंतु आता या फेरी सेवेमुळे त्याला पुन्हा चालना मिळणार आहे.

CJI Surya Kant : कायदेशीर व्यवसायात महिलांसाठी एक भक्कम व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न !
Russian President Vladimir Putin : ‘ब्रिक्स’ जागतिक अर्थव्यवस्थेची नवीन महाशक्ती !
Dominican Republic Plane Crash : ‘डोमिनिकन रिपब्लिक’मध्ये जेट कोसळले : वैमानिक आणि सह-वैमानिक ठार !
PM Modi Record : पंतप्रधान मोदी सर्वाधिक काळ सरकारप्रमुख राहिलेले नेते बनले !
Iran Israel War : इराण-इस्रायल यांच्यात पुन्हा उडाला युद्धाचा भडका !
Philippines Earthquake : फिलिपीन्समध्ये ७.८ रिक्टर तीव्रतेचा भूकंप : १९ जणांचा मृत्यू !