
कोल्हापूर – श्री क्षेत्र जोतिबा प्राधिकरणाचा विकास करतांना कोल्हापूरची परंपरा, बाज राखला जाईल, अशा पद्धतीने आराखडा सिद्ध करण्यावर भर द्यावा, अशा सूचना पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केल्या. श्री क्षेत्र जोतिबा प्राधिकरण विकास आराखडा सिद्ध करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने संकल्पना स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. यात अंदाजे १ सहस्र ६०० कोटी रुपयांचे आराखडे सहभागी स्पर्धकांनी सिद्ध केले आहेत. या आराखड्यांचे सादरीकरण पालकमंत्री केसरकर यांनी पाहिले, तसेच त्या संदर्भातील सूचना दिल्या.
पालकमंत्री पुढे म्हणाले, ‘‘जोतिबा प्राधिकरणाचा अंतिम आराखडा निश्चित झाल्यानंतर येथील विकासकामे करतांना दगडी बांधकामावर भर द्यावा. मराठा वास्तूशैलीचा वापर करावा, तसेच आवश्यक निधीचे प्रावधान होण्यासाठी राज्यशासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल.’’
पनवेल येथे मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिर
अकोला येथे ‘गुरु-शिष्य परंपरा : आधुनिक शिक्षणासाठी प्राचीन प्रणाली’ यावर व्याख्यान !
आषाढी वारीनिमित्त ‘बंगाली एज्युकेशन सोसायटी स्कूल’च्या विद्यार्थ्यांनी काढली हरिनाम दिंडी !
मोपा येथील ‘फॉर्म्युला रेसिंग’ स्पर्धेसाठी वीजदेयकात २ कोटी रुपयांची सवलत
राष्ट्रपतींना पाठवायचे निवेदन साहित्यिकांकडून मराठी राजभाषा निर्धार समितीकडे सुपुर्द
सर्वाेच्च न्यायालयाचा निवाडा होईपर्यंत कळसा-भंडुरा प्रकल्पांना वन मंत्रालयाची संमती मिळणार नाही !