श्रीलंकेच्या नौदलाकडून भारताच्या १७ मासेमार्‍यांना अटक !

श्रीलंकेच्या सागरी सीमेत घुसखोरी करून मासेमारी केल्याचा आरोप

कोलंबो (श्रीलंका) – श्रीलंकेच्या सागरी सीमेमध्ये घुसखोरी करून मासेमारी केल्याच्या आरोपावरून श्रीलंकेच्या नौदलाने १७ भारतीय मासेमार्‍यांना अटक केली. त्यांच्या ३ नौकाही जप्त करण्यात आल्या आहेत. श्रीलंकेच्या उत्तरेकडील जाफना येथील काकरथिवू बेटाजवळ श्रीलंकेच्या नौदालाने ही कारवाई केली.

संपादकीय भूमिका 

श्रीलंका किंवा पाकिस्तान यांच्या सागरी सीमेत कथित घुसखोरी करून मासेमारी केल्यावर या देशांचे नौदल भारतीय मासेमार्‍यांना नेहमीच अटक करते. यावर आतापर्यंत उपाययोजना न काढणे, हे गेल्या ७५ वर्षांतील सर्व शासनकर्त्यांसाठी लज्जास्पद !