
कोल्हापूर – गेले ४ दिवस चालू असलेल्या पावसामुळे पंचगंगा नदीचे पाणी आता धोक्याच्या पातळी म्हणजे ३९ फुटांकडे वाटचाल करत आहे. २१ जुलैला नदीची पाणीपातळी ३५ फूट ४ इंच नोंदवली गेली. अतीवृष्टीमुळे जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेर जाणारे अनेक मार्ग बंद झाले आहेत. यात प्रामुख्याने कोल्हापूर-पणजी हा आंबोली घाटातून जाणारा मार्ग पूर्णपणे बंद असून गडहिंग्लज, गगनबावडा, आजरा तालुक्यातील काही रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. पोहोळे ते बाजार भोगाव रस्त्यावर पुलाचे पाणी आल्याने कोल्हापूर ते राजापूर राज्य मार्ग बंद करण्यात आला आहे.

इचलकरंजी येथेही पाण्याची पातळी झपाट्याने वाढत असून ती सध्या ५८ फुटांपर्यंत पोचली आहे. यामुळे प्रशासनाने तात्काळ दक्षतेच्या उपाययोजना चालू केल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात ८८ गावांना भूस्खलनाचा धोका असल्याने या गावांमध्ये प्रशासनाची पथके कार्यरत ठेवण्यात येणार आहेत. प्रतिदिन सकाळ आणि सायंकाळी ही पथके परिसराची पहाणी करतील. शाहूवाडी तालुक्यातील कांडवण येथील २३ कुटुंबांचे दक्षतेचा उपाय म्हणून स्थलांतर करण्यात आले आहे. दुपारी १२.३० वाजता पडसाळी लघु पाटबंधारे तलाव पूर्ण भरून सांडव्याद्वारे विसर्ग चालू झाला आहे.
सातारा – जिल्ह्यातील कोयना धरणातील पाण्याच्या साठ्यातही झपाट्याने वाढ होत असून सध्या धरणात ४० टी.एम्.सी. पाणीसाठा आहे.
अकोला येथे ‘गुरु-शिष्य परंपरा : आधुनिक शिक्षणासाठी प्राचीन प्रणाली’ यावर व्याख्यान !
आषाढी वारीनिमित्त ‘बंगाली एज्युकेशन सोसायटी स्कूल’च्या विद्यार्थ्यांनी काढली हरिनाम दिंडी !
मोपा येथील ‘फॉर्म्युला रेसिंग’ स्पर्धेसाठी वीजदेयकात २ कोटी रुपयांची सवलत
राष्ट्रपतींना पाठवायचे निवेदन साहित्यिकांकडून मराठी राजभाषा निर्धार समितीकडे सुपुर्द
सर्वाेच्च न्यायालयाचा निवाडा होईपर्यंत कळसा-भंडुरा प्रकल्पांना वन मंत्रालयाची संमती मिळणार नाही !
युवकांनी अपप्रचाराला बळी न पडता स्वतःच्या उज्ज्वल भवितव्याकडे लक्ष द्यावे ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री