
मुंबई, १९ जुलै (वार्ता.) – लंपी रोगावरील लस सिद्ध करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने केंद्रशासनासमवेत सामंजस्य करार केला आहे. ही लस सिद्ध करण्यासाठी पुणे येथे एका प्रयोगशाळेची निर्मिती करण्यात आली आहे. या प्रयोगशाळेत लसीची निर्मिती करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य लंपी रोगावरील लसीचा पुरवठा देशाला करेल, अशी माहिती पशूसंवर्धनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत दिली.
१९ जुलै या दिवशी काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी लातूर येथे लंपी रोगामुळे जनावरांचा मृत्यू झाल्याचा प्रश्न सभागृहात उपस्थित करून शेतकर्यांना आर्थिक साहाय्य करण्याचे आवाहन केले. यावर विखे पाटील यांनी विधीमंडळाचे अधिवेशन संपण्यापूर्वी उर्वरित शेतकर्यांना आर्थिक साहाय्य करण्याचे आश्वासन दिले. लंपी रोगामुळे राज्यात एकूण ३९ सहस्र ६५४ पशूधनाचा मृत्यू झाला असून ३७ सहस्र ५२८ शेतकर्यांना आर्थिक साहाय्य करण्यात आले आहे. लंपी रोगावरील दुसर्या टप्प्यातील लसीकरण चालू करण्यात आले असल्याचे या वेळी विखे पाटील यांनी सांगितले.
नागपूर येथे हिंदु महिलेच्या धर्मांतराचा प्रयत्न; दर्ग्याच्या बाबासह ६ जणांवर गुन्हा नोंद !
तळलेल्या वाटाण्यात कृत्रिम रंगाचा वापर होत असल्याने अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई !
राष्ट्र आणि धर्मनिष्ठ युवा निर्मितीसाठी सज्जनगड येथे पार पडले ‘हिंदु धर्मसंस्कार शिबीर’
महाराष्ट्र शासनाने ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’ त्वरित रहित करावा – अधिवक्ता श्री. विश्वास पानसे, प्रमुख विश्वस्त, मार्तंड देवस्थान, जेजुरी
‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’ कायदा रहित करा ! – महाराष्ट्र मंदिर महासंघाचे ठिकठिकाणी निवेदन