पंतप्रधान मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचा १०० वा भाग प्रसारित !

नवी देहली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रत्येक मासाला आकाशवाणीवरून प्रसारित होणारा कार्यक्रम ‘मन की बात’चा ३० एप्रिल या दिवशी १०० वा भाग प्रसारित झाला. या कार्यक्रमाचे न्यूयॉर्कस्थित संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयासह देश-विदेशांत ४ लाख ठिकाणी प्रसारण झाले. भाजपने प्रत्येक विधानसभा मतदारसंघात सरासरी १०० ठिकाणी हे भाषण ऐकण्याची व्यवस्था केली होती. केंद्रीय मंत्री, राज्यांचे मुख्यमंत्री, मंत्री आदीदेखील विविध ठिकाणी कार्यक्रम ऐकण्यासाठी उपस्थित होते.
या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी पर्यटनावर जोर दिला. भारतियांनी विदेशात पर्यटनाला जाण्याऐवजी स्वतःच्या राज्याच्या व्यक्तीरिक्त देशातील किमान १५ पर्यटनस्थळांना भेटी देण्याचे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी या वेळी केले.
CJP Social Media : सीजेपी आंदोलनातील सामाजिक माध्यमांच्या ५०० हून अधिक विदेशी खात्यांवर कारवाई चालू ! – महाराष्ट्र सायबर पोलीस
Gadchiroli Maoist Posters: गडचिरोलीत माओवाद्यांचे फलक आणि पत्रके आढळली !
शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणे, हा नागरिकांना राज्यघटनेने दिलेला मूलभूत अधिकार ! – Supreme Court
कांचीपूरम् (तमिळनाडू) येथील श्री कल्याण वरद मंदिराच्या स्थळवृक्षाचे श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या हस्ते करण्यात आले रोपण !
Exam Reforms Task Force : परीक्षांमधील सुधारणांसाठी पंतप्रधानांकडून उच्चस्तरीय कृती दलाची स्थापना !
ConfirmTkt Controversy : ‘कन्फर्म तिकीट’ आस्थापनाने श्री गणेशाचा अवमान करणारे विज्ञापन हटवले