
मुंबई, १५ मार्च (वार्ता.) – जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील उंबरखेड येथे शासकीय धान्य साठवणुकीचा अथवा वाहतुकीचा कोणताही परवाना नसतांना काळ्या बाजारात विक्रीच्या उद्देशाने ट्रक, तसेच गोदामात तांदळचा साठा करून ठेवणार्यांवर कडक कारवाई केली जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १५ मार्च या दिवशी विधानसभेत तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली. आमदार शिरीष चौधरी यांनी हा प्रश्न विचारला होता.
उपमुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, या प्रकरणात चाळीसगाव येथील मेहुणबारे पोलीस ठाण्यात २० डिसेंबर २०२२ या दिवशी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. २ आरोपींना अटक करण्यात आली असून अन्वेषण चालू आहे.
जलदगती न्यायालये स्थापन करण्याच्या पंतप्रधानांच्या निर्णयाचे स्वागत ! – डॉ. सावंत, मुख्यमंत्री
‘एकादश तीर्थयात्रा’ योजनेचा आजपासून खांडोळा येथून शुभारंभ होणार
‘मराठी अभ्यास केंद्रा’ची मराठी शाळांतील इंग्रजी बालवाड्यांविरुद्ध बैठक !
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून गोमांसाची तस्करी करणारे वाहन पकडले; दीड टन मांस जप्त
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे मुख्यमंत्र्यांनी घेतले दर्शन !
आजच्या थोडक्यात महत्त्वाच्या बातम्या (२४.७.२०२६)