
मुंबई, १ मार्च (वार्ता.) – सरकारकडून अधिक पटीने पैसा मिळावा, यासाठी अनिलकुमार गायकवाड या सरकारी अधिकार्याची तेलशुद्धीकरण प्रकल्पाच्या नियोजित ठिकाणी सहस्रो एकर भूमी आहे. काही आमदारांनी तेथे भूमी खरेदी केल्या आहेत. काही पत्रकारांनाही भूमी देण्यात आल्या आहेत, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या मृत्यूविषयी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवरील चर्चेच्या वेळी केला. शशिकांत वारिशे यांची हत्या राजकीय असल्याचा गंभीर आरोपही या वेळी आव्हाड यांनी केला.
यावर उत्तर देतांना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘जमीन कुणी खरेदी केल्या आहेत, त्याची माहिती घेतली जाईल. यामध्ये सरकारी अधिकारी असतील, तर त्यांच्याकडे एवढा पैसा कुठून आला ? याचे अन्वेषण केले जाईल. कुणी विरोधात बोलले म्हणून महाराष्ट्रात कारवाई होणार नाही’, असे सांगितले.
भंडारा येथे अन्न आणि औषध प्रशासनाची २ औषध प्रतिष्ठानांवर कारवाई !
राज्याचे ‘क्वांटम’ आणि ‘डीप टेक’ धोरण लवकरच आणण्यात येणार ! – मुख्यमंत्री
यवत (पुणे) येथे विनाअनुमती गर्भलिंग निदान करणारा मुख्य सूत्रधारास अटक !
मुलीला मारल्याची न्यायबाह्य स्वीकृती आरोपीने दिली होती ! – ग्रामस्थाने दिली साक्ष
पाकिस्तानशी संबंधित ‘रील्स’ पाहिल्यामुळे अहिल्यानगर येथील तरुणांची चौकशी !
वाढत्या वायू प्रदूषणामुळे पुढील ३० वर्षांत २ अंशांपर्यंत तापमानवाढीचे संकट !