गोद्री (जिल्हा जळगाव) येथे २५ जानेवारीपासून ‘अखिल भारतीय बंजारा महाकुंभ मेळाव्या’चे आयोजन !

वाशिम – जळगाव जिल्ह्यातील गोद्री येथे २५ ते ३० जानेवारी या कालावधीत ‘अखिल भारतीय बंजारा महाकुंभ मेळावा’ होणार आहे. धर्मांतर आणि लव्ह जिहाद यांसारखे प्रकार कुठे घडत आहेत, याविषयी मेळाव्याच्या माध्यमातून ते सरकारी दरबारी मांडता येतील. यासाठी मेळाव्याला सर्व बंजारा बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन धर्मपिठाचे महंत जितेंद्र महाराज यांनी केले आहे.
१. शिवबंधन बांधलेले महंत सुनील महाराज यांनी म्हटले आहे की, भाजप, संघ परिवार महामेळाव्याला प्रति पोहरादेवीच दर्जा देत आहे. यामुळे बंजारा समाजासाठी काशी असलेल्या पोहरादेवीचे महत्त्व अल्प करण्याचा डाव रचण्यात आला आहे. बंजारा समाजाची काशी ही पोहरादेवीच असून येथील महत्त्व अल्प करण्यासाठी भाजप-राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रयत्न करत आहेत. महामेळाव्यात बंजारा समाजातील लोकांनी जाऊ नये.
२. आयोजनात भाजप पक्षातील काही लोक असल्याने त्याचा लाभ भाजपला होणार असल्याचा समज चुकीचा आहे. धर्म संरक्षणासाठी बंजारा बांधवांनी एकत्र यावे’, असे आवाहन जितेंद्र महाराज यांनी केले.
३. बंजारा समाजाचे पोहरादेवीचे धर्मगुरु बाबूसिंग महाराज यांनी सांगितले की, हा मेळावा बंजारा समाजाचा आहे. आमच्याशी चर्चा करूनच या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यात पक्षाचे काहीही देणे घेणे नाही. बंजारा समाजातील सर्व बांधव यात सहभागी होतील.
नेत्रदीपक रिंगण आणि बंधूभेटीनंतर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज अन् जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे पंढरपूरमध्ये आगमन !
जलदगती न्यायालये स्थापन करण्याच्या पंतप्रधानांच्या निर्णयाचे स्वागत ! – डॉ. सावंत, मुख्यमंत्री
‘एकादश तीर्थयात्रा’ योजनेचा आजपासून खांडोळा येथून शुभारंभ होणार
‘मराठी अभ्यास केंद्रा’ची मराठी शाळांतील इंग्रजी बालवाड्यांविरुद्ध बैठक !
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून गोमांसाची तस्करी करणारे वाहन पकडले; दीड टन मांस जप्त
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे मुख्यमंत्र्यांनी घेतले दर्शन !