
नवी देहली – भ्रमणभाष संच उत्पादक आस्थापनांनी १० सहस्र रुपये किंवा त्याहून अधिक किमतीचे ३ जी आणि ४ जी इंटरनेटची सुविधा असलेल्या स्मार्टफोनचे उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ते आता १० सहस्रांपेक्षा अधिक किमतीचे ५ जी स्मार्टफोनचे उत्पादन करणार आहेत. दूरसंचार विभाग आणि इलेक्ट्रॉनिक्स अन् माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने मोबाईल ऑपरेटर आणि स्मार्टफोन उत्पादक आस्थापनांसमवेत बैठक घेतली. या आस्थापनांना येत्या ३ मासांत ५ जी सेवेकडे वळण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सध्या भारतात ७५ कोटी लोक भ्रमणभाषचा वापर करतात. त्यापैकी १० कोटी लोक ५ जी भ्रमणभाष वापरतात. त्याच वेळी ३५ कोटी लोक अजूनही ३ जी आणि ४ जी असलेले संच वापरतात.
Goalpara School Beef Row : आसाममधील एका शाळेत मुसलमान विद्यार्थ्यांकडून हिंदु विद्यार्थ्यांना गोमांस भरवण्याचा प्रयत्न
उत्तराखंडामध्ये सरकारी भूमीवरील अवैध मजार बुलडोझरद्वारे पाडली
चिंचवड (पुणे) येथील श्री मोरया गोसावी मंदिर परिसरातील यात्रेत ‘मेड इन पाकिस्तान’ लेबल असलेल्या चादरीची विक्री !
Andaman Natural Gas :अंदमान ‘शॅलो ऑफशोर ब्लॉक’मध्ये सापडला नैसर्गिक वायूचा दुसरा मोठा साठा
Mumbai Hub Of Bangladeshi Infiltrators : मुंबई बांगलादेशी घुसखारांचे केंद्र : १ सहस्र ५०० हून अधिक ठिकाणी घुसखोरांचे अड्डे !
Temple Land Protection Movement : ‘देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’ला स्थगिती !