राहुल गांधी सावरकर यांचा वारंवार अवमान करत आहेत ! – देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस आणि राहुल गांधी

मुंबई – राहुल गांधी सावरकर यांचा वारंवार अवमान करत आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर ब्रिटिशांकडून पैसा घेत होते, रा.स्व. संघाने ब्रिटिशांना साहाय्य केले, अशी वक्तव्ये त्यांनी केली आहेत. राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेसाठी उद्धव ठाकरे त्यांच्या कार्यकर्त्यांना पाठवणार आहेत का ? राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा ते निषेध करणार आहेत का ?, असा प्रश्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो’ यात्रेच्या काळात वरील वक्तव्ये करून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान केला आहे.