
ठाणे, ८ ऑगस्ट (वार्ता.) – कळवा येथील मदरशातील शिक्षकाकडून होणार्या मारहाणीच्या जाचाला कंटाळून ५ मुले पळून गेली. कळवा रेल्वे स्थानकाकडून कल्याणच्या दिशेने जाणार्या लोकलमध्ये १२ ते १४ वर्षांची अल्पवयीन मुले घाबरलेल्या स्थितीत एका महिला प्रवाशाला दिसली. त्यांच्या चर्चेतून त्यांच्या समवेत काहीतरी चुकीचे वर्तन झाल्याचे महिलेच्या लक्षात आले. महिलेने रेल्वे नियंत्रण कक्षाला संपर्क करून याविषयी माहिती दिली. डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी या पाचही मुलांना उतरवून त्यांची चौकशी केली असता ही मुले मदरशातील शिक्षकाकडून होणार्या मारहाणीला कंटाळून त्यांच्या बिहार येथील मूळ गावी जात असल्याचे समजले. या प्रकरणी मदरशातील शिक्षकाच्या विरोधात डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याविषयी पुढील अन्वेषण चालू आहे.
संपादकीय भूमिकाहे आहे मदरशांचे वास्तव ! मुलांचा छळ करणार्या अशा मदरशांवर बंदीच घालायला हवी ! |
थोडक्यात महत्त्वाचे : ०८.०६.२०२६
पुणे येथे हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे धर्मांतर करण्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ !
तीर्थक्षेत्र पैठण येथे ८ नाल्यांचे दुर्गंधीयुक्त आणि रसायनमिश्रित पाणी गोदावरी नदीपात्रात !
भिगवण (पुणे) येथे अल्पवयीन मुलीला धमक्या देत विनयभंग !
तुळापूर (आळंदी) येथील ‘विश्वसंस्कृती’ इमारतीतील अनधिकृत ‘प्रोजेक्ट एक्स’ मेजवानीवर पोलिसांची धाड !
सनातन संस्थेच्या वतीने मथुरा येथे ५ दिवसांचा ‘सनातन संस्कार प्रशिक्षण वर्ग’ पार पडला !