
श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आजादी का अमृत महोत्सव’ या मोहिमेच्या अंतर्गत सर्व नागरिकांना १२ ते १५ ऑगस्टपर्यंत स्वतःच्या घरावर तिरंगा फडकवण्याचे आवाहन केले आहे. भारत सरकारच्या या योजनेच्या अंतर्गत देशातील २० कोटी घरांवर तिरंगा फडकवला जाईल, असा अंदाज आहे; मात्र जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी यावर आक्षेप घेतला आहे. त्यांनी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यावरही टीका केली आहे. ‘माजी राष्ट्रपती यांनी एक असा वारसा मागे सोडला आहे, ज्यामुळे राज्यघटना पायदळी तुडवली जात आहे’, असा आरोप मुफ्ती यांनी ट्वीट करून केला आहे.
#BJP and the #Kashmir district administration’s undertaking to encourage locals to unfurl the Tricolour on the occasion of 75th #IndependenceDay has gathered sharp criticism from former CM & PDP president #MehboobaMufti. | @peerashiq reports. https://t.co/G6ZKFfcIAA
— The Hindu (@the_hindu) July 24, 2022
अन्य एका ट्वीटमध्ये मेहबूबा यांनी म्हटले आहे की, कलम ३७० असो, नागरिकत्व कायदा असो किंवा अल्पसंख्य आणि दलित यांच्यावर झालेली आक्रमणे असो, त्यांनी राज्यघटनेच्या नावावर भाजपची राजकीय कार्यसूची (अजेंडा) पूर्ण केली, अशीही टीका मुफ्ती यांनी केली.
संपादकीय भूमिकाअशांवर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवून त्यांना आजन्म कारागृहात टाकण्याचे धाडस केंद्र सरकारने दाखवले पाहिजे ! |
उत्तराखंडामध्ये सरकारी भूमीवरील अवैध मजार बुलडोझरद्वारे पाडली
Andaman Natural Gas :अंदमान ‘शॅलो ऑफशोर ब्लॉक’मध्ये सापडला नैसर्गिक वायूचा दुसरा मोठा साठा
Mumbai Hub Of Bangladeshi Infiltrators : मुंबई बांगलादेशी घुसखारांचे केंद्र : १ सहस्र ५०० हून अधिक ठिकाणी घुसखोरांचे अड्डे !
Temple Land Protection Movement : ‘देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’ला स्थगिती !
Bhangar Blast : बंगालमधील भांगर बाँबस्फोट प्रकरणी तृणमूल काँग्रेसचा माजी आमदार शौकत मोल्ला यास अटक
Putin Praises India : भारतीय हे जगातील सर्वांत प्रतिभावान लोकांपैकी एक आहेत ! – व्लादिमिर पुतिन, राष्ट्राध्यक्ष, रशिया