२ सहस्र ६४२ आंदोलकांना अटक

नवी देहली – केंद्र सरकारने अग्निपथ योजना आणली, तेव्हापासून विरोधकांनी असे वातावरण निर्माण केले की, या योजनेच्या विरोधात देशभरात प्रचंड हिंसक निदर्शने करण्यात आली. या योजनेला बिहार राज्यात सर्वाधिक विरोध झाला. अनेक रेल्वेगाड्या जाळल्या. अग्निपथ योजनेच्या विरोधातील हिंसाचारात रेल्वेची एकूण २६० कोटी रुपयांची हानी झाली, अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नुकतीच संसदेत एका लेखी प्रश्नाच्या उत्तरात दिली.
अग्निपपथ योजनेच्या विरोधातील आंदोलनाच्या कालावधीत देशभरात एकूण २ सहस्र १३२ रेल्वेगाड्या रहित कराव्या लागल्या होत्या. या वेळी उसळलेल्या हिंसाचारात २ जण ठार झाले, तर ३५ जण घायाळ झाले होते. या वेळी २ सहस्र ६४२ आंदोलकांना अटक करण्यात आली, अशीही माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली.
संपादकीय भूमिकाहिंसक आंदोलन करून सार्वजनिक मालमत्तेची हानी करणार्यांना सरकारने आजन्म कारागृहात टाकून त्यांच्याकडून हानीभरपाई वसूल करावी, त्याचा भुर्दंड जनतेवर पडू देऊ नये ! |
पाकव्याप्त काश्मीरमधील जनआंदोलन आणि भारताची रणनीती !
कल्याण येथे मद्यधुंद तरुणाकडून पोलीस कर्मचार्यावर जीवघेणे आक्रमण !
जेन-झी यांना काही लोक प्रामाणिक वाटले, तर ते लगेच प्रभावित होतात !
विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेत परीक्षा सुधारणा विधेयकावर चर्चा झाली नाही !
कारगिल युद्ध म्हणजे भारतीय सैनिकांच्या अजोड पराक्रमाची अमरगाथा ! – कर्नल नरेश कुमार गोयल (निवृत्त)
CJP Social Media : सीजेपी आंदोलनातील सामाजिक माध्यमांच्या ५०० हून अधिक विदेशी खात्यांवर कारवाई चालू ! – महाराष्ट्र सायबर पोलीस