‘पी.एफ्.आय.कडून मागासवर्गियांना समवेत घेऊन इस्लामिक राष्ट्र बनवण्याचे षडयंत्र !

‘मिशन २०४७’ साठी बनवले ‘जय भीम-जय मिम’ हे शस्त्र !

नवी देहली – जिहादी आतंकवादी संघटना ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ने  (पी.एफ्.आय.ने) हिंदु समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा कट रचला असून देशाला ‘इस्लामिक राष्ट्र’ बनवण्याचा घाट घातला आहे. याच पार्श्‍वभूमीवर पी.एफ्.आय.च्या जिहादी नेत्यांकडून भारतात ‘जय भीम-जय मिम’ ही घोषणा देण्यात आली आहे. पोलिसांनी पी.एफ्.आय.च्या कार्यालयावर टाकलेल्या धाडीमध्ये काही कागदपत्रे सापडली आहेत. त्यातून हा कट उघड झाला आहे.

१. ‘पी.एफ्.आय.’च्या कार्यालयात ‘इंडिया व्हिजन २०४७’ नावाची धारिका सापडली आहे. त्यात ‘भ्याड हिंदू’ंवर पूर्णपणे वर्चस्व राखण्यासाठी एक ‘रोडमॅप’ (योजना) बनवल्याचा उल्लेख आहे. यामध्ये अनुसूचित जाती- जमाती आणि इतर मागासवर्गीय हिंदूंमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी द्वेष निर्माण करणे आणि त्यांना सोबत घेऊन इस्लामिक राष्ट्र बनवण्याचा कट समाविष्ट आहे.

२. या धारिकेत म्हटले आहे, ‘पी.एफ्.आय.’ने अनुसूचित जाती-जमाती आणि इतर मागासवर्गीय हिंदु समुदायासोबत जवळीक साधून युती केली पाहिजे आणि निवडणुकीत काही जागा जिंकल्या पाहिजेत.

३. ‘पी.एफ्.आय.’ला अनुसूचित जाती-जमाती आणि इतर मागासवर्गीय यांच्यापर्यंत पोचण्यासाठी आणि इस्लामिक राजवट प्रस्थापित करण्यासाठी ‘राष्ट्रीय ध्वज’, ‘राज्यघटना’ आणि ‘आंबेडकर’ यांसारख्या संकल्पनांचा वापर ढाल म्हणून करावा लागेल, असेही म्हटले आहे.

४. ‘जेव्हा ‘पी.एफ्.आय’कडे पुरेसे प्रशिक्षित जिहादी कार्यकर्ते निर्माण होतील आणि शस्त्रसाठाही मुबलक असेल, तेव्हा मुसलमानांनी इस्लामिक तत्त्वांवर आधारित नवीन राज्यघटना घोषित करावी. त्या वेळी बाह्य शक्तीही आपल्याला साहाय्य करतील. आपले विरोधक पद्धतशीरपणे आणि व्यापक स्तरावर नष्ट केले जातील आणि भारतात इस्लामिक वैभव पुनर्स्थापित होईल’, असे या धारिकेत म्हटले आहे.

संपादकीय भूमिका

  • ‘मागासवर्गियांसमवेत मुसलमान का मैत्री करतात ?’, हे आतातरी त्यांच्या लक्षात येईल का ?
  • ‘पी.एफ्.आय.’ देशविघातक कारवाया करत असल्याचे असंख्य पुरावे समोर येत असतांनाही सरकार त्याच्यावर बंदी का घालत नाही ?’, हा प्रश्‍न राष्ट्रप्रेमींना पडला आहे !