मुंबई – ग्रामीण पातळीपर्यंत ‘ऑप्टीकल फायबर’द्वारे (ऑप्टीकल फायबरद्वारे म्हणजे अतिशय सूक्ष्म काच किंवा प्लास्टिकच्या तंतूमधून प्रकाशाच्या वेगाने इंटरनेट पुरवणे. यामध्ये इंटरनेटचा वेग अधिक असतो.) सक्षम आणि दर्जेदार ब्रॉडबँड इंटरनेट सेवा पोचण्यासाठी राज्यात ‘महानेट डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड’ स्थापन करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. १६ जून या दिवशी मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
भारतनेट फेज १ प्रकल्प ‘भारत ब्रॉडबँड नेटवर्क लिमिटेड’ आणि भारत संचार निगम लिमिटेड यांच्या माध्यमातून राबवण्यात आला. सुधारित ‘भारतनेट फेज २’ च्या माध्यमातून सर्व ग्रामपंचायती आणि ग्रामीण भागांतील घरांपर्यंत उच्च गतीने ब्रॉडबँड सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे. यासाठी विशेष हेतूने काम करण्यासाठी संस्थेची स्थापना करण्यात येत आहे. या अंतर्गत ‘भारतनेट फेज १ आणि २’ मधील सर्व प्रकरणे या विशेष हेतू संस्थेकडे हस्तांतरित केली जाणार आहेत. भारतनेट फेज २ अंतर्गत महाराष्ट्रातील ८५३ ग्रामपंचायतींमध्ये ‘डिजिटल कनेक्टिव्हिटी’ स्थापन करण्यात आली आहे.

अश्लीलता पसरवणार्या ‘स्टँडअप कॉमेडी’ कार्यक्रमांना परिनिरीक्षण मंडळाची पूर्वानुमती अनिवार्य करा !
कौटुंबिक भूमी वाटणीच्या वाटपाचे धोरण सरकारकडून निश्चित !
लहान बाळांना गोमांस खाण्याचा सल्ला देणार्यांवर गुन्हा नोंदवा ! – विश्व हिंदु परिषद
केरळ आणि तमिळनाडू यांचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्या हस्ते ‘चैतन्य’ दिनदर्शिकेचे प्रकाशन !
ड्रोन, रोबोट्स, स्वयंचलित वाहने यांसाठी ‘महाराष्ट्र स्वयंचलित प्रणाली’ घोषित !
संस्कार, संस्कृत भाषा आणि सनातन हिंदु संस्कृती यांचे पुनरुज्जीवन ही काळाची आवश्यकता ! – सदाशिव ढवळेगुरुजी, सहमंत्री, ‘संस्कृत भारती’