
पनवेल – आमचे सरकार हिंदुत्ववादी आहे. आमचे हिंदुत्व हे संकुचित नाही. आमचे हिंदुत्व कोणत्याही धर्माचे लांगूलचालन करणारे नाही. जो या भारतीय संस्कृतीचा अभिमान बाळगतो, त्यांना समवेत घेऊन चालणारे आमचे हिंदुत्व आहे. आमचे हिंदुत्व सर्वांना समान न्याय देणारे आहे. आमचे सरकार हे हिंदुत्ववादी आणि मराठी माणसासाठी लढणारे आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत बोलत होते.
जे काम कुणीही सहज करू शकतो, ते महाविकास आघाडी सरकारला 2.5 वर्ष का जमले नाही?
कारण त्यांच्यात इच्छाशक्ती नव्हती. केवळ राजकारण करण्यापलीकडे त्यांनी काहीही केले नाही. ओबीसी आरक्षण त्यांना द्यायचेच नव्हते: देवेंद्र फडणवीस @Dev_Fadnavis— @OfficeOfDevendra (@Devendra_Office) July 23, 2022
ते पुढे म्हणाले की, आम्ही स्वच्छ, प्रामाणिक आणि लोकाभिमुख सरकार देण्याचा प्रयत्न करू. आम्ही महाराष्ट्राला देशात एक क्रमांकाचे राज्य बनवू. आम्ही ज्या गोष्टी २० दिवसांत केल्या, त्या महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात झाल्या नाहीत; कारण त्यांच्यात इच्छाशक्तीचा अभाव होता. इच्छाशक्ती असलेले आमचे सरकार सत्तेत आल्यावर लगेचच इतर मागासवर्गियांशी (‘ओबीसीं’शी) संबंधित अहवाल मिळवून तो सर्वोच्च न्यायालयात सादर केला, त्यामुळे ‘ओबीसीं’ना आरक्षण मिळाले.
मालमत्ता नोंदणीसह ‘जलमेट्रो’ला गती आणि ३१ ऑगस्टपासून विधानसभा अधिवेशन
मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !
राज्यातील ४२३ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्तेचे केले जाणार मुद्रीकरण !
थोडक्यात महत्त्वाचे (२३.०७.२०२६)
काँग्रेस देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे ! – अमित साटम, प्रदेशाध्यक्ष, भाजप, मुंबई
रावेत-नर्हे ‘एलिव्हेटेड कॉरिडॉर’च्या ‘डी.पी.आर्.’ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मान्यता !