
नवी मुंबई, १६ जुलै (वार्ता.) – केंद्र सरकारने जीवनावश्यक खाद्यपदार्थांवर ५ टक्के वस्तू आणि सेवा कर (जी.एस्.टी.)लावण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाच्या विरोधात वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या धान्य बाजारपेठेतील व्यापार्यांनी एक दिवसाचा बंद पाळला होता. ‘सरकारच्या या निर्णयामुळे देशातील ७ सहस्र ३०० बाजारपेठा आणि १३ सहस्र डाळ गिरण्या, १ सहस्र ६०० तांदूळ गिरण्या, ८ सहस्र पिठाच्या गिरण्यांसह ३ कोटी लहानमोठ्या व्यापार्यांना फटका बसणार आहे’, असे धान्य, तांदूळ आणि तेलबिया व्यापारी संघाचे (ग्रोमा) अध्यक्ष शरद मारू यांनी सांगितले.
१८ जुलैपासून याविषयीचा निर्णय देशभरात लागू करण्यात येणार असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. त्याला व्यापार्यांनी कडाडून विरोध केला आहे. वस्तू आणि सेवा करामुळे महागाई वाढून त्याचा फटका सर्वसामान्यांना बसणार आहे. त्यामुळे ‘हा कर मागे घ्यावा’, अशी मागणी या वेळी व्यापार्यांनी केली.
पान मसाला, गुटखा आणि भेसळीचे अन्नपदार्थ यांचा दीड कोटीहून अधिक किमतीचा साठा जप्त
नागपूर येथे मानसिक तणावातून ‘नीट’ परीक्षेतील विद्यार्थिनीची आत्महत्या
कीर्तन हे मनाला उपदेश करणारे आहे ! – ह.भ.प. रोहिणी माने-परांजपे
धोकादायक इमारतीमधील रहिवास बंद करून त्या स्वतःहून पाडाव्यात !
बेदखल कुळांच्या प्रश्नाविषयी बविआचे लांजा तहसीलदारांना निवेदन
तरुणीशी अनेक वर्षे शारीरिक संबंध ठेवून लग्नास नकार देणार्या तरुणावर गुन्हा नोंद