पंतप्रधानांनी हैद्राबादला संबोधले ‘भाग्यनगर’ !

भाग्यनगर (तेलंगाणा) – भाजपची दोन दिवसांची राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक ‘विजय संकल्प सभे’च्या रूपाने येथे ३ जुलै या दिवशी पार पडली. या वेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘‘आम्ही विरोधात होतो, तेव्हा ‘संघर्ष यात्रा’ काढत होतो. संघर्ष आमच्या वृत्तीत आहे. लोकांना आमच्याकडून प्रेमाची अपेक्षा आहे.’’ समाजाच्या सर्व वर्गांपर्यंत पोचण्यासाठी आता ‘स्नेह यात्रा’ काढावी, असेही ते म्हणाले.
Vijaya Sankalpa Sabha in Hyderabad, Telangana. #BJP4NewTelangana.https://t.co/gYpLzBFGT2
— G Kishan Reddy (@kishanreddybjp) July 3, 2022
पंतप्रधान मोदी यांनी हैद्राबादच्या ऐवजी भाग्यनगरचा नामोल्लेख करत म्हटले की, भाग्यनगरमध्येच सरदार पटेल यांनी ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ची हाक दिली होती. आमचा एकच कार्यक्रम आहे, तुष्टीकरण संपवून तृप्तीचा मार्ग स्वीकारायचा आहे.
पंतप्रधानांनी पक्ष कार्यकर्त्यांना सांगितले की, ‘सर्वांची साथ, सर्वांचा विकास’ संकल्प वास्तवात येण्यासाठी मुसलमान समाजातील बहुसंख्य वर्गास विकासाच्या मुख्य प्रवाहाशी जोडणे आवश्यक आहे.
पुढील ३०-४० वर्षे भाजपचे युग ! – गृहमंत्री शहात्याआधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले, येत्या ३०-४० वर्षांपर्यंत भाजप युग राहील आणि भारत विश्वगुरु बनेल. |
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कलबुर्गी (कर्नाटक) येथे कारागृहाची भिंत ओलांडून ३ बंदीवान पसार !
चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना मिळालेला जामीन रहित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
कर्नाटक : न्यायाधिशांच्या खुर्चीवर करणी केल्याच्या आरोपा प्रकरणी महिलेला अटक