
मुंबई, ४ जुलै (वार्ता.) – अमरावती येथील औषध विक्रेता उमेश कोल्हे यांची हत्या ही गंभीर घटना आहे. ज्या कारणाने त्यांना मारण्यात आले, ते अतिशय निंदनीय आहे. या घटनेतील आरोपी आणि मुख्य सूत्रधार पकडले गेले असले, तरीही यामागे काही विदेशी शक्ती आहे का ? याची चौकशी करण्यात येईल. प्रारंभी या प्रकरणाला दरोड्याचे कारण देण्यात आले होते. तशा प्रकारची वृत्ते पसरवली गेली; परंतु अजूनही पूर्ण चौकशी करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ४ जुलै या दिवशी विधानभवनात पत्रकारांशी बोलतांना केले. उमेश कोल्हे यांच्या हत्येचा कट पशूवैद्य असणाऱ्या शेख इरफान शेख रहीम यानेच रचला होता. या गटात सामील असणारा डॉ. युसुफ खान हा उमेश कोल्हे यांच्या अंत्ययात्रेतही सहभागी झाला होता, अशी माहिती पोलीस अन्वेषणातून समोर आली आहे.
संपादकीय भूमिकाहिंदुत्वनिष्ठांच्या हत्या करण्यापर्यंत जाणारी धर्मांधांची मजल मोडून काढण्यासाठी नवे सरकार पावले उचलेल, ही अपेक्षा ! |
मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !
राज्यातील ४२३ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्तेचे केले जाणार मुद्रीकरण !
थोडक्यात महत्त्वाचे (२३.०७.२०२६)
काँग्रेस देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे ! – अमित साटम, प्रदेशाध्यक्ष, भाजप, मुंबई
‘कॉकरोच जनता पक्षा’च्या समर्थनार्थ मुंबईत काँग्रेसचे आंदोलन !
रावेत-नर्हे ‘एलिव्हेटेड कॉरिडॉर’च्या ‘डी.पी.आर्.’ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मान्यता !