
मुंबई, २९ जून (वार्ता.) – शिवसेनेच्या आमदारांनी बंड पुकारल्यानंतर चारही बाजूंनी संकटाने घेरलेल्या महाविकास आघाडी सरकारला आणखी एक धक्का बसला. ३० जूनला जवळपास ३ घंटे दोन्ही पक्षांकडून युक्तीवाद झाल्यानंतर सकाळी ११ वाजता विधीमंडळात घेण्यात येणारी बहुमत चाचणी रोखण्यास सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट नकार देऊन महाविकास आघाडीची याचिका फेटाळली. त्यामुळे ३० जूनला विश्वासदर्शक चाचणीला सरकारला सामोरे जावे लागणार होते; परंतु २९ जूनच्या रात्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचे त्यागपत्र दिल्याने महाविकास आघाडीला नामुष्कीला सामोरे जावे लागणार नाही.
न्यायालयाच्या निर्णयानंतर सरकार बहुमत सिद्ध करणार कि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदाचे त्यागपत्र देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सरकारच्या विरोधात हा निर्णय गेल्याने परिणामी सरकारला बहुमत सिद्ध करण्याखेरीज पर्याय राहिला नव्हता.
अकोला येथे ‘गुरु-शिष्य परंपरा : आधुनिक शिक्षणासाठी प्राचीन प्रणाली’ यावर व्याख्यान !
आषाढी वारीनिमित्त ‘बंगाली एज्युकेशन सोसायटी स्कूल’च्या विद्यार्थ्यांनी काढली हरिनाम दिंडी !
मोपा येथील ‘फॉर्म्युला रेसिंग’ स्पर्धेसाठी वीजदेयकात २ कोटी रुपयांची सवलत
राष्ट्रपतींना पाठवायचे निवेदन साहित्यिकांकडून मराठी राजभाषा निर्धार समितीकडे सुपुर्द
सर्वाेच्च न्यायालयाचा निवाडा होईपर्यंत कळसा-भंडुरा प्रकल्पांना वन मंत्रालयाची संमती मिळणार नाही !
युवकांनी अपप्रचाराला बळी न पडता स्वतःच्या उज्ज्वल भवितव्याकडे लक्ष द्यावे ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री