पोलिसांचा ‘सायबर सेल’ प्रतिदिन हटवत आहे ५० पोस्ट्स

मुंबई – भाजपच्या माजी प्रवक्त्या नूपुर शर्मा आणि ज्ञानव्यापी यांविषयी १० जून या दिवशी देशभरात हिंसाचार झाला. असा प्रकार पुन्हा घडू नये, यासाठी महाराष्ट्र पोलीस सतर्क झाले आहेत. ‘पोलिसांच्या ‘सायबर सेल’कडून प्रतिदिन ५० पोस्ट्स हटवल्या जात आहेत. यातून सामाजिक प्रसारमाध्यमांवर हिंसेला प्रोत्साहन देण्याचा हेतू नष्ट करता येईल’, असे ‘सायबर सेल’चे पोलीस महानिरीक्षक यशस्वी यादव यांनी सांगितले.
महाराष्ट्र पोलीस सातत्याने मौलवींशी संपर्क साधत आहेत. त्याद्वारे ‘शुक्रवारच्या प्रार्थनेनंतर सर्वांनी शांतपणे घरी जावे’, असे आवाहन मौलानांनी करण्याविषयी सांगितले जात आहे. १० जून या दिवशी संभाजीनगर, सोलापूर, जालना आणि कोल्हापूर येथे मुसलमान रस्त्यावर उतरले होते. सर्वच ठिकाणाचा जमाव पहाता पोलिसांचा बंदोबस्त अल्प पडला होता. (याला राज्याच्या गुप्तचर यंत्रणेचे अपयश म्हणायचे कि पोलिसांची अकार्यक्षमता ? – संपादक)
संपादकीय भूमिका
|
थोडक्यात महत्त्वाचे : ०६.०६.२०२६
‘श्री महालक्ष्मीदेवी मंदिर परिसर विकास आराखड्या’तील १३६ जागांचे सर्वेक्षण पूर्ण ! – डॉ. विजय राठोड, जिल्हाधिकारी, कोल्हापूर
हिंजवडी ‘आयटी पार्क’ मधील ‘थिंकटेक इंडिया’ आस्थापन रातोरात बंद !
आरे परिसरातील ८० एकर जागेत ५ लाख वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ !
श्री महालक्ष्मीदेवी मंदिरासह परिसरातील गड-दुर्ग यांना एकत्र करून ‘टुरिस्ट सर्किट’ करणार ! – शंभूराज देसाई, खनिजकर्ममंत्री
महिला पर्यटकांचे व्हिडिओ काढणार्याला अटक