पोलिसांचा ‘सायबर सेल’ प्रतिदिन हटवत आहे ५० पोस्ट्स

मुंबई – भाजपच्या माजी प्रवक्त्या नूपुर शर्मा आणि ज्ञानव्यापी यांविषयी १० जून या दिवशी देशभरात हिंसाचार झाला. असा प्रकार पुन्हा घडू नये, यासाठी महाराष्ट्र पोलीस सतर्क झाले आहेत. ‘पोलिसांच्या ‘सायबर सेल’कडून प्रतिदिन ५० पोस्ट्स हटवल्या जात आहेत. यातून सामाजिक प्रसारमाध्यमांवर हिंसेला प्रोत्साहन देण्याचा हेतू नष्ट करता येईल’, असे ‘सायबर सेल’चे पोलीस महानिरीक्षक यशस्वी यादव यांनी सांगितले.
महाराष्ट्र पोलीस सातत्याने मौलवींशी संपर्क साधत आहेत. त्याद्वारे ‘शुक्रवारच्या प्रार्थनेनंतर सर्वांनी शांतपणे घरी जावे’, असे आवाहन मौलानांनी करण्याविषयी सांगितले जात आहे. १० जून या दिवशी संभाजीनगर, सोलापूर, जालना आणि कोल्हापूर येथे मुसलमान रस्त्यावर उतरले होते. सर्वच ठिकाणाचा जमाव पहाता पोलिसांचा बंदोबस्त अल्प पडला होता. (याला राज्याच्या गुप्तचर यंत्रणेचे अपयश म्हणायचे कि पोलिसांची अकार्यक्षमता ? – संपादक)
संपादकीय भूमिका
|
संपादकीय : पारपत्राचा अनावश्यक गोंधळ !
ढवळी परिसरात बिबट्याचे आक्रमण
मळेवाड येथे बिबट्याच्या आक्रमणात वासराचा मृत्यू
गोव्यातील ५६ गावांच्या शहरीकरणाच्या अधिसूचनेला विरोध
अत्याचार केल्याप्रकरणी धर्मांधाला सश्रम कारावास आणि दंड !
आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज