
संभाजीनगर – शहरातील पाणीप्रश्नावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली २३ मे या दिवशी महापालिकेवर काढण्यात येणाऱ्या भव्य मोर्च्याची सिद्धता चालू झाली आहे. ही योजना फसवी आहे. पाणीपट्टी निम्मी झाली; मात्र पाण्याचे काय ? असा प्रश्न करत भाजपचे पदाधिकारी प्रभागांत बैठका घेत आहेत. लोकांना सहभागी करून घेण्यासाठी प्रत्येक प्रभागातील पन्ना-बूथप्रमुख, मंडळ अध्यक्ष, शहराध्यक्ष, आमदार, मंत्री आणि विविध विंगचे पदाधिकारी काम करत आहेत. लोकांच्या घरात होणाऱ्या बैठका आता मंदिरात होत आहेत. ‘शिवसेनेची पाणीपट्टी अल्प करण्याची घोषणा फसवी आहे. लेखी आदेश नाहीत. पाणीपट्टी अल्प करून नळाला ४ दिवसांआड नियमित पाणी येणार आहे का ?’, असा प्रश्न केला जात आहे.
लाचखोर तहसीलदार विजय चव्हाण यांच्याकडे सापडले घबाड !
‘एन्.आय.टी. गोवा’ची भरती प्रक्रिया तात्पुरती स्थगित !
थोडक्यात महत्त्वाचे : ०९.०६.२०२६
पुणे येथे पोलिसांचा गणवेश घालणार्या बनावट मुसलमान महिलेला अटक !
गोव्यातील मटका जुगाराचे अन्वेषण करणारे विशेष अन्वेषण पथक बंद करण्यास याचिकाकर्त्याचा विरोध
श्री विठ्ठलमूर्ती संवर्धनासाठी रासायनिक लेपनाला विरोधच; धर्मशास्त्रानुसार लेपन करा ! – महाराष्ट्र मंदिर महासंघ