विधानसभेतील आमदारांवरील खटल्याचाही निकाल ६ वर्षांनी न लावणारी न्यायप्रणाली जनतेच्या दाव्यांचा त्यांच्या जन्मात तरी निकाल देईल का ?

‘निवडून आलेले आमदार कायद्यापेक्षा मोठे असू शकत नाहीत, तसेच त्यांना गुन्हेगारी कृत्ये करण्याचीही सूट नाही, अशा शब्दांत सर्वाेच्च न्यायालयाने केरळ सरकारची कानउघाडणी केली. केरळ विधानसभेत वर्ष २०१५ मध्ये गदारोळ करणाऱ्या आमदारांवरील शिस्तभंगाची कारवाई मागे घेण्याची मागणी केरळ सरकारने एका याचिकेद्वारे सर्वाेच्च न्यायालयात केली होती. ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर केरळमधील उपद्रवी आमदारांविरुद्ध खटला चालवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.’

  • गुन्हा घडल्यानंतर गुन्हेगारांना जेवढी विलंबाने शिक्षा, तेवढे अन्य गुन्हेगारांचे मनोधैर्य वाढते ! हे लक्षात घेऊन केंद्र सरकारने गुन्हेगारांविरुद्धचे खटले जलद गतीने चालवून त्यांना शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत !
  • अशा जनताद्रोही आमदारांवर त्यांचे सदस्यत्व कायमस्वरूपी रहित करण्याची कारवाई झाली, तरच अन्य आमदारांवर वचक बसेल ! लोकशाहीत हे शक्य आहे का ?