धैर्य असेल, तर हैदराबादमधून निवडणूक लढवून दाखवा ! – ओवैसी

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना आव्हान

भाग्यनगर (तेलंगाणा) – काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे तेलंगाणा राज्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी तेलुगु राष्ट्र समिती, भाजप आणि एम्.आय.एम्. यांना निवडणुकीत आव्हान देण्यासाठी राज्यात आल्याचे म्हटले होते. त्यांच्या या विधानावर एम्.आय.एम्.चे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी टीका केली आहे. ओवैसी म्हणाले, ‘‘धैर्य असेल, तर हैदराबादमधून (भाग्यनगरमधून) निवडणूक लढवून दाखवा. राहुल गांधी केरळच्या वायनाडमध्येही हरणार आहेत.’ गांधी हे वर्ष २०१९ मध्ये वायनाड या मुसलमानबहुल क्षेत्रातून खासदार म्हणून निवडून आले.