
मुंबई – आजही आमचा श्वास बाळासाहेबांच्या विचारांनी चालतो. मुंबईसह महाराष्ट्रात भोंग्यांवर आंदोलन करावे, अशी परिस्थिती नाही. सर्वांनी अनुमती घेतली असल्याने कारवाईची आवश्यकता नाही. हाच नियम मंदिर, चर्च आदी सर्वांना लागू आहे, असे विधान शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केले. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ४ मे या दिवशी सकाळी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणाचा एक व्हिडिओ ट्वीट केला होता. त्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी ही भूमिका मांडली. ‘बाळासाहेबांनी कधीच म्हटले नाही की, मंदिरावरील भोंगे बंद करा’, असेही राऊत यांनी या वेळी सांगितले.
मनसेच्या भोंगा आंदोलनावर शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी टीका केली. आंदोलन का करताय ते अगोदर ठरवा. महाराष्ट्रात नियमानुसारच भोंगे आहेत. मला तर आंदोलन कुठेच दिसत नाही, अशी टीका संजय राऊत यांनी मनसेवर केली.@rautsanjay61 @RajThackeray #politics #maharashtra pic.twitter.com/3Dx0zhlLdr
— Sarkarnama (@SarkarnamaNews) May 4, 2022
राऊत पुढे म्हणाले,
‘‘राज्यात शांतता असून कोणतेही आंदोलन झालेले नाही. बाळासाहेब ठाकरे यांनी भोंगे आणि नमाज यांच्याविषयी भूमिका घेतली होती. सत्ता आल्यावर त्यांनी नमाज बंद केले. रस्त्यावरील नमाजावर तोडगा काढल्यावर तेही बंद झाले. भोंग्यांविषयी सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप केल्यावर भोंगे बंद झाले.
राज ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंचे विचार पुन्हा तपासावेत, हवं तर भाषणाचे कॅसेट पाठवू : संजय राऊतhttps://t.co/OKMeFHkzCn#RajThackeray #MNS #SanjayRaut #HanumanChalisa
— Maharashtra Times (@mataonline) May 4, 2022
राज ठाकरे यांनी बाळासाहेब समजावून घ्यावेत.’’
केरळम्मधील ‘इंडियन युनियन मुस्लिम लीग’च्या पहिल्या महिला आमदाराने रेस्टॉरंटचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने केल्याने कट्टरतावाद्यांची टीका
भारतीय व्यापार्यांनी ‘हलाल अर्थव्यवस्थे’चा धोका ओळखून त्याला विरोध करणे आवश्यक !
२ सख्ख्या हिंदु बहिणींचा छळ करणार्या पसार आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद !
दुबईत नोकरी लावण्याच्या आमीषाने धर्मांधाकडून हिंदु शिक्षिकेवर अत्याचार : ६ तोळे सोने आणि लाखो रुपयांची लूट !
मुंबई विमानतळावर ५ कोटी रुपयांचे सोने जप्त, ७ जणांना अटक !
Bangladeshis At Hakimpur : हकीमपूर (बंगाल) येथील सीमेवर प्रतिदिन २०० ते ३०० बांगलादेशी परत जाण्यासाठी पोचत आहेत !