संस्कृत राष्ट्रीय भाषा झाली पाहिजे  – कंगना राणावत

कंगना राणावत

मुंबई – तमिळ, हिंदी या जुन्या भाषा आहेत; मात्र त्यांच्याहीपेक्षा अधिक जुनी संस्कृत भाषा आहे. कन्नड, तमिळ पासून ते गुजराती, हिंदी आदी भाषा संस्कृतमधून निर्माण झाल्या आहेत. संस्कृत ही भारताची राष्ट्रीय भाषा झाली पाहिजे, असे मत अभिनेत्री कंगना राणावत यांनी एका मुलाखतीमध्ये व्यक्त केले.