अमृतसरमधील सीमा सुरक्षा दलाच्या मुख्यालयात एका सैनिकाने सहकारी सैनिकांवर केलेल्या गोळीबारात ४ सैनिक ठार, तर २ जण घायाळ

गोळीबार करणार्‍या सैनिकाने स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या  

अशा घटना टाळण्यासाठी सरकार कोणती पावले उचलणार आहे ? – संपादक

अमृतसर (पंजाब) – येथील सीमा सुरक्षा दलाच्या मुख्यालयात ६ मार्चला सकाळी भोजनकक्षामध्ये १४४ बटालियनचे सैनिक अल्पाहार करत होते. या वेळी एका सैनिकाने रागाच्या भरात अंदाधुंद गोळीबार चालू केला. या गोळीबारात ४ सैनिक ठार झाले, तर अन्य २ सैनिक घायाळ झाले. नंतर गोळीबार करणार्‍या या सैनिकाने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. या सैनिकांमध्ये आपापसांत कामावरून वाद होता.