महाराष्ट्रातील गड-दुर्गांवर अनधिकृत मजार, दर्गे, थडगे बांधून होणारे इस्लामीकरण रोखण्यासाठी तात्काळ अतिक्रमण हटवा !

हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर येथे निवेदन

निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव (डावीकडे) यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ

कोल्हापूर, २६ जानेवारी (वार्ता.) – महाराष्ट्रातील गड-दुर्गांवर अनधिकृत मजार, दर्गे, थडगे बांधून होणारे इस्लामीकरण रोखण्यासाठी पुरातत्व विभागाचे पथक पाठवून सर्व अतिक्रमणे तात्काळ हटवण्यात यावीत, या मागणीचे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे महासंचालक यांच्या नावे असलेले निवेदन २४ जानेवारी या दिवशी निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव यांना देण्यात आले. या वेळी शिवसेना करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव, हिंदुत्वनिष्ठ श्री. शरद माळी, श्री महालक्ष्मीदेवी भक्त समितीचे श्री. प्रमोद सावंत, ‘महाराष्ट्र सोल्सर्ज फोर्स’ (रेस्क्यु)चे अध्यक्ष श्री. सुरेश पाटील, विशाळगड रक्षण आणि अतिक्रमण विरोधी कृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. बाबासाहेब भोपळे आणि श्री. शिवानंद स्वामी उपस्थित होते.