वर्धा येथे उपाहारगृहातील अन्नातून ११ जणांना बाधा !

वर्धा – येथील नामांकित अंबिका उपाहारगृहामध्ये दही कलाकंद आणि दही समोसा खाल्याने ११ लोकांना अन्नातून बाधा झाली आहे. अन्नबाधा झालेल्या सर्व रुग्णांना उलट्या आणि जुलाब यांचा मोठा त्रास चालू झाला. ४ जानेवारी या दिवशी सायंकाळी ६ वाजता ही घटना घडली. आनंदनगर आणि अशोकनगर येथील हे रहिवासी आहेत. ११ रुग्णांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. यामध्ये एकाची प्रकृती गंभीर आहे. अन्नबाधेत एका ५ वर्षांचा मुलगा आणि २ महिला यांचाही समावेश आहे.