वर्धा – येथील नामांकित अंबिका उपाहारगृहामध्ये दही कलाकंद आणि दही समोसा खाल्याने ११ लोकांना अन्नातून बाधा झाली आहे. अन्नबाधा झालेल्या सर्व रुग्णांना उलट्या आणि जुलाब यांचा मोठा त्रास चालू झाला. ४ जानेवारी या दिवशी सायंकाळी ६ वाजता ही घटना घडली. आनंदनगर आणि अशोकनगर येथील हे रहिवासी आहेत. ११ रुग्णांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. यामध्ये एकाची प्रकृती गंभीर आहे. अन्नबाधेत एका ५ वर्षांचा मुलगा आणि २ महिला यांचाही समावेश आहे.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > वर्धा येथे उपाहारगृहातील अन्नातून ११ जणांना बाधा !
वर्धा येथे उपाहारगृहातील अन्नातून ११ जणांना बाधा !
नूतन लेख
- बिहार येथून कोल्हापूर येथे जाणार्या ३२ अल्पवयीन मुलांना मिरज रेल्वे पोलिसांनी कह्यात घेतले !
- पुणे येथील प्रतिष्ठित महाविद्यालयांनी अनेक वर्षे लेखापरीक्षण केलेच नाही !
- गडचिरोली जिल्ह्यात रानटी हत्तीचा धुमाकूळ !
- मावळ (पुणे) लोकसभा मतदारसंघात आचारसंहिता भंगाच्या ६८ तक्रारी प्राप्त !
- सोलापूर येथे १ मे या दिवशी नवीन न्यायालयाच्या इमारतीचा पायाभरणी कार्यक्रम !
- नाशिकरस्ता येथे मधमाशांचा ७० नागरिकांना चावा !