
अमरावती – काही दिवसांपूर्वी शहरात झालेल्या हिंसाचारानंतर संचारबंदी लावण्यात आली आहे. या संचारबंदीमध्ये केवळ अत्यावश्यक दुकानांना मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे पश्चिम विदर्भातील सर्वांत मोठी अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती गेल्या ६ दिवसांपासून बंद आहे. याचा फटका जिल्ह्यातील शेतकर्यांना बसत आहे. सध्या रब्बी हंगाम चालू आहे. या हंगामासाठी शेतकर्यांना पैशांची आवश्यकता आहे; परंतु बाजार समितीच बंद असल्याने सोयाबीन, तसेच अन्य शेतमाल विकावा तरी कुठे ?, असा प्रश्न शेतकर्यांना पडला आहे. त्यामुळे ‘तात्काळ बाजार समिती चालू करावी’, अशी मागणी जिल्ह्यातील शेतकर्यांनी केली आहे.
धर्मांतरितांना अनुसूचित जमातीच्या सवलती द्यायच्या का ?, हे निश्चित करण्यासाठी महाराष्ट्रात समिती स्थापन !
उच्चस्तरीय चौकशी समिती नेमणार्या आयुक्त डॉ. मंजिरी मनोळकर यांचे स्थानांतर
नक्षली कारवायांमुळे उपेक्षित गडचिरोलीतील २२ ठिकाणी होणार ‘आपले सरकार सेवा केंद्रे’
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १७.०७.२०२६)
मोशी दुर्घटनेप्रकरणी मुख्य आणि कार्यकारी अभियंते निलंबित !