
अमरावती – काही दिवसांपूर्वी शहरात झालेल्या हिंसाचारानंतर संचारबंदी लावण्यात आली आहे. या संचारबंदीमध्ये केवळ अत्यावश्यक दुकानांना मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे पश्चिम विदर्भातील सर्वांत मोठी अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती गेल्या ६ दिवसांपासून बंद आहे. याचा फटका जिल्ह्यातील शेतकर्यांना बसत आहे. सध्या रब्बी हंगाम चालू आहे. या हंगामासाठी शेतकर्यांना पैशांची आवश्यकता आहे; परंतु बाजार समितीच बंद असल्याने सोयाबीन, तसेच अन्य शेतमाल विकावा तरी कुठे ?, असा प्रश्न शेतकर्यांना पडला आहे. त्यामुळे ‘तात्काळ बाजार समिती चालू करावी’, अशी मागणी जिल्ह्यातील शेतकर्यांनी केली आहे.
श्रीक्षेत्र भीमाशंकर परिसरात निर्माण होणार ‘हेरिटेज वाडी’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली भूमीची पहाणी
आजपासून पावसाळ्याचे विशेष वेळापत्रक लागू !
श्रीक्षेत्र मार्लेश्वर येथे पुलाच्या कामासाठी केले जात असलेल्या अवैध सुरुंग स्फोटांमुळे मंदिराला धोका !
आषाढी वारीच्या तोंडावर इंद्रायणी नदीपात्र येथे मृत माशांचा खच
शालार्थ आयडी मान्यतेसाठी अधिकार्यांना १५ दिवसांची मुदत !
अवैधरित्या खतांची निर्मिती आणि विक्री करणारे यांच्यावर गुन्हा नोंद