
सांगली, १५ ऑक्टोबर (वार्ता.) – सध्याच्या काळात विद्यार्थी बराच काळ भ्रमणभाषवर असतात. त्यामुळे ते वाचनसंस्कृती आणि संस्कार यांपासून लांब जात आहेत. तरी विद्यार्थ्यांवर संस्कार होण्यासमवेत पालकांनाही धर्मशिक्षण मिळणे अत्यावश्यक आहे, असे मत भाजपचे आमदार श्री. सुधीर गाडगीळ यांनी व्यक्त केले. सनातन संस्थेच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’च्या निमित्ताने त्यांची भेट घेतली असता त्यांनी हे मत व्यक्त केले. या वेळी आमदार श्री. गाडगीळ यांना ‘सनातन पंचांग २०२२’ भेट देण्यात आले. या प्रसंगी सनातन संस्थेच्या सौ. स्मिता माईणकर, हिंदु जनजागृती समितीच्या श्रीमती मधुरा तोफखाने, श्री. संतोष देसाई उपस्थित होते.

कोल्हापूर – हुपरी येथे भाजपच्या महिला आघाडीच्या हुपरी शहरप्रमुख, तसेच विद्यमान नगरसेविका सौ. ऋतुजा अभिनव गोंधळी यांची भेट घेऊन त्यांना अभियानाविषयी अवगत करण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या सौ. विजया वेसणेकर यांनी सौ. ऋतुजा अभिनव गोंधळी यांना ‘सनातन पंचांग २०२२’ भेट दिले.
मोपा येथील ‘फॉर्म्युला रेसिंग’ स्पर्धेसाठी वीजदेयकात २ कोटी रुपयांची सवलत
राष्ट्रपतींना पाठवायचे निवेदन साहित्यिकांकडून मराठी राजभाषा निर्धार समितीकडे सुपुर्द
सर्वाेच्च न्यायालयाचा निवाडा होईपर्यंत कळसा-भंडुरा प्रकल्पांना वन मंत्रालयाची संमती मिळणार नाही !
युवकांनी अपप्रचाराला बळी न पडता स्वतःच्या उज्ज्वल भवितव्याकडे लक्ष द्यावे ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
डहाणू ते जव्हारपर्यंतची २१ सहस्र २२ झाडे तोडण्याची न्यायालयाची अनुमती !
शिवसेनेचे नेते सचिन अहिर यांच्या घरी ३ कोटी ५० लाख रुपयांची चोरी !