
सांगली, २५ सप्टेंबर (वार्ता.) – महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून महिलांवर होणार्या अत्याचारांचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत आहे. पुणे, साकीनाका, जालना, नागपूर, परभणी, पालघर, नांदेड, डोंबिवली येथे घडलेल्या बलात्काराच्या घटना महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अस्मितेला काळिमा फासणार्या आहेत. महाविकास आघाडी सरकार महिला अत्याचाराविरुद्ध कुठलीही भक्कम कारवाई करण्यात अपयशी ठरले आहे. त्यामुळे सरकारला जाग येण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात ‘ढोल वाजवा’ आंदोलन करण्यात आले.
आंदोलनानंतर निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी बर्डे-चौगुले यांना निवेदन देण्यात आले. या वेळी जिल्हा संयोजक ऋषिकेश पोतदार, जिल्हा सहसंयोजक विशाल जोशी, महानगरमंत्री ऋषिकेश पाटील, सहमंत्री दर्शन मुंदडा, बागेश्री उपळाविकर, अनुश्री विसपुते, तन्वी खाडीलकर, सूरज मालगावे यांच्यासह विद्यार्थी कार्यकर्ते उपस्थित होते.
जंजिरा दुर्गावर कायमस्वरूपी भगवा ध्वज फडकवा, अन्यथा तीव्र आंदोलन करू ! – ‘सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान’ची चेतावणी !
Pakistan Visa Ban Demand : पाकिस्तानला देण्यात येणारे आर्थिक साहाय्य आणि पाकिस्तान्यांना देण्यात येणारा व्हिसा थांबवावा !
गोव्यातील धरणांतील जलसाठ्यात लक्षणीय वाढ
अंमलबजावणी संचालनालयाच्या अनेक राज्यांमध्ये एकाच वेळी धाडी
पाकव्याप्त काश्मीरची भारतात ‘घरवापसी’ करतांना भारताची भूमिका काय असावी ?
उच्च न्यायालयाच्या कडक भूमिकेनंतर मोरजी किनारपट्टीवरील २३ अनधिकृत बांधकामे पाडली