(म्हणे) ‘मी आणि माझे कुटुंब काश्मिरी पंडित असल्याने मी माझ्या बाधवांना साहाय्य करीन !’ – राहुल गांधी

  • राहुल गांधी यांना इतक्या दशकानंतर ‘ते काश्मिरी पंडित असून त्यांच्या बांधवांना साहाय्य केले पाहिजे’, याची जाणीव झाली, हे लक्षात घ्या ! या काळात काँग्रेस कितीतरी वर्षे केंद्रात सत्तेवर होती. त्या काळात राहुल गांधी यांनी त्यांच्या काश्मिरी बांधवांसाठी काय केले, याचे उत्तर ते देतील का ? आणि आता सत्ता नसतांना ते काय साहाय्य करणार आहेत ? हेही त्यांनी सांगितले पाहिजे ! – संपादक
  • राहुल गांधी यांचे हे विधान म्हणजे काश्मिरी हिंदूंच्या जखमांवर मीठ चोळण्यासारखेच आहे. खरेच काँग्रेसला आणि गांधी परिवाराला काश्मिरी हिंदूंसाठी काही करायचे असते, तर केव्हाच करता आले असते; मात्र मुसलमानांच्या लांगूलचालनापोटी हिंदूंना वार्‍यावर सोडण्याची मानसिकता असल्याने काँग्रेसने काहीही केले नाही. हाच काँग्रेसचा इतिहास, वर्तमान आणि भविष्यही असणार आहे ! – संपादक
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी

जम्मू (जम्मू-काश्मीर) – काल मी वैष्णोदेवीचे दर्शन घेतले. जेव्हा कधीही मी जम्मू-काश्मीरला येतो, तेव्हा मला असे वाटते की, मी माझ्याच घरी आलो आहे. माझेही कुटुंब काश्मिरी पंडित आहे. त्यामुळे मला तुम्हाला सांगायचे आहे की, मी जे काही बोलेन ते खोटे नसेल. माझे जे भाऊ काश्मिरी पंडित आहेत त्यांना मी साहाय्य करीन, असे फुकाचे आश्‍वासन काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी येथे केले. राहुल गांधी सध्या जम्मू-काश्मीरच्या दौर्‍यावर आहेत. त्यांनी जम्मूमधील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्या वेळी ते बोलत होते.